प्रतिनिधी /बांबोळी
शिक्षण खात्याच्या आदेशानुसार कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत दोन वर्षानंतर सोमवार दि. 20 फ्sढबुवारीपासूर राज्यातील पूर्वप्राथमिक ते उच्चमाध्यमिक शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यामुळे शाळेतील वर्गात पुन्हा किलबिलाट सुरू झाला. बांबोळी कुजिरा संकुलातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक आपली वाहने घेऊन आले होते. मात्र पोलिसांनी बांबोळीत मार्गावर बॅरिकेटस् घालून एकमार्ग बंद केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची बरीच तारांबळ उडाली.
कुजिरा संकुलात प्रवेश केल्यानंतर एका मार्गाने वाहनांना फ्gढटबॉल मैदानाला वळसा घालून परत महार्गावरून किंवा बगल मार्गातून आपली वाहने वळवावी लागतात. रस्ता ओलांडताना वाहनांना धोका पत्कारावा लागत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी ही समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हालचाली सुरू करव्यात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने कुजिरा संकुलातील शाळा व्यवस्थापनांनी, शिक्षणखात्याच्या अधिकाऱयांनी व वाहतूक पोलिसअधिकाऱयांनी त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बऱयाच शाळांनी विद्यार्थ्यांचे आरती ओवाळून, पुष्पवृष्टी करून स्वागत केल्याचे दिसून आले. येत्या दोन दिवसात आणखीकाही सुधारणा होणार असल्याचे शिक्षणखत्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.