मोजक्याच गल्ल्यांमधील खड्डे बुजवून नागरिकांच्या डोळय़ात धूळफेक करण्याचा प्रकार : रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेंतर्गत बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बाजारपेठेत येणाऱया प्रत्येक रस्त्यावर खड्डे आणि चरी निर्माण झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खड्डे व चरी बुजविण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली होती. मात्र सदर मोहीम अर्ध्यावरच थांबविण्यात आली असून काही मोजक्मयाच गल्ल्यांमधील खड्डे बुजवून नागरिकांच्या डोळय़ात धूळफेक करण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम थांबविण्यामागे गौडबंगाल काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. विशेषतः बाजारपेठेअतंर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे पडूनही याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही रस्त्यांचे डांबरीकरण अलिकडेच करण्यात आले होते. पण त्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात येत आहे. पण काही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना दुरुस्तीचे काम हाती घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
बसवाण गल्ली येथील खड्डय़ांमध्ये खडी आणि डांबर घालून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर अन्य ठिकाणी निर्माण झालेले खड्डे बुजविण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक प्रत्येक गल्लीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना अडचणी निर्माण होत आहेत. खड्डे बुजविण्याच्या कामातही महापालिका प्रशासनाकडून दुजाभाव केला असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. यामुळे महापालिकेच्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे रस्त्याची दुरुस्ती आणि दुसरीकडे दुर्लक्ष असा भेदभाव का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
तात्पुरते काम करण्यामागचा उद्देश काय?
शहरातील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने निधी मंजूर करूनही तात्पुरते काम करण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास नागरिक आणि व्यावसायिकांना होत आहे. खड्डे बुजविण्याची कार्यवाही व्यवस्थित होत नसून पेवळ खड्डे बुजविण्याचा दिखावा सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.