कोरोनाचे संकट अद्याप जैसे थे, खबरदारी घेण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहर पुन्हा गतिमान झाले. 43 दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहरातील अनेक व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहे. शुक्रवारी वस्त्रप्रावरणे, पादत्राणे यांचीही दुकाने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीदार आणि विपेते या दोघांचीही गर्दी आहे. आर्थिकदृष्टय़ा विचार करता बाजारपेठेत गर्दी होणे हे स्वागतार्ह ठरत असले तरी आरोग्याच्यादृष्टीने विचार करता ही बाब अद्यापही धोक्मयाच्या पातळीवरच आहे, हे लक्षात घेणे फार गरजेचे आहे.
शहर गतिमान झाले आणि सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता व्यावसायिक, किरकोळ दुकानदार, मॅकेनिक, रस्त्यावरील विपेते, भाजी विपेते यांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती ग्राहकाची. ग्राहकांनासुद्धा आपली शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करण्याची घाई झाली आहे.
त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी दिसून आली. सध्या कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नाही. शुक्रवारी तर राज्याचा आणि बेळगाव जिल्हय़ाचा कोरोनाबाधिताचा आकडा वाढला. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र याची जाणीव रस्त्यावरील गर्दीला नसावी असेच चित्र सध्यातरी आहे. वाहनधारक, पादचारी, विपेते, खरेदीदार हे आवर्जुन मास्क वापरत आहेत. परंतु कोठेही अपवाद वगळता सॅनिटायझरचा वापर होत असल्याचे दिसून आले नाही. हात सतत धुण्याचा महत्त्वाचा नियमही जवळजवळ धुडकावून लावला गेलेला आहे.
शुक्रवारी सकाळी पुस्तकांची दुकाने, फोटोप्रेम, मिठाईची दुकाने, वस्त्रप्रावरणे, इलेक्ट्रीकल्स, पडदे डेकोरेटर्स, पेंटस्, फर्निचर, जनरेटर मोटर, स्क्रिन पेटिंग, टेलरिंग, गॅरेज, हार्डवेअर, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, खेळणी यांची दुकाने उघडलेली दिसली. रसवंतीगृहाची चाके फिरू लागली आहेत. त्या तुलनेने, कोल्ड्रींक्सची दुकाने अर्धवट उघडलेली दिसून आली. हार्डवेअरची दुकाने आठवडय़ाभरापासूनच कार्यान्वित झाली आहे. चिरमुरे, फुटाणे विक्रीच्या भट्टीही सुरू झाल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात औषध विपेत्यांनी निरंतर सेवा पुरविली. औषधांची दुकाने नियमित सुरू आहेत. याचबरोबर दूध विक्री केंदेसुद्धा लॉकडाऊनमध्ये सुरू होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर रस्त्यावर किरकोळ विपेते दिसू लागले आहेत. नरगुंदकर भावे चौक, शहापूर भाजी मार्केट, समादेवी गल्ली, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव येथे रस्त्यांवरील विपेते दिसून आले. बहुसंख्य विपेत्यांनी आपल्या दुकानाच्या दारासमोर मास्क विक्रीस ठेवले आहे. अगदी स्टेशनरी दुकानातही आता मास्क मिळू लागले आहेत. परंतु रस्त्यांवरही मास्कची विक्री तेजीत सुरू आहे.
दुकानदारांसमोर कामगारांची समस्या
शुक्रवारपासून वस्त्रप्रावरणाची दुकाने उघडली. वस्त्रप्रावरणाच्या दुकानात तुलनेने गर्दी कमी दिसली. या दुकानदारांना कामगारांचाही प्रश्न पडला आहे. स्थानिक कामगार येत आहेत. परंतु बेळगावच्या आसपास असणाऱया गावातील कामगार वाहतूक सुविधा नसल्याने अद्याप येऊ शकत नाहीत, असे अमरकॉनचे संचालक हरिष गुलाबानी यांनी सांगितले.
सामाजिक अंतर पाळा
एप्रिल- मे या दिवसात बहुसंख्य घरांमध्ये रंगरंगोटी केली जाते. त्यामुळे पेंटस्ची दुकाने उघडण्याची प्रतीक्षा नागरिकांना होती. जशी ही दुकाने सुरू झाली तशी खरेदीसाठी गर्दी झाली. सर्वांना सामाजिक अंतर पाळा, असे सतत सांगावे लागते. रंग खरेदी करून नेतो. रिक्षाची सोय करून द्या, असेही ग्राहक सांगत आहेत. मात्र रंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. हळुहळू बस्तान बसेल, असा विश्वास सौंदर्य पेंटस्चे संचालक आर. आय. पाटील यांनी व्यक्त केले.