प्रतिनिधी/ फोंडा
बाजारमळ कुर्टी येथे कचरापेटय़ा ठेवण्याच्या जागी उघडय़ावर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने तो कुजून आसपास राहणाऱया नागरिकांना असहय़ दुर्गंधी व इतर सामस्यांना सामोरे जावे लागत आहे. कचरा व बाजूच्या गटारातील सांडपाण्यामुळे डासांची पैदास होऊन रोगराई फैलावण्याची भितीही येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मगो पक्षाचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर, माजी पंचसदस्य प्रिया बाबू च्यारी व काही स्थानिकांनी एकत्र येऊन येथील कचरा त्वरित हटवण्याची, तसेच याठिकाणी ठेवल्या जाणाऱया कचरा पेटय़ा दुसऱया जागी हलविण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचे लेखी पत्र कुर्टी पंचायतीला सादर सादर केले होते. मात्र येथील कचऱयाची साफसफाई न झाल्याने नागरिकांनी एकत्र येऊन त्या विरोधात आवाज उठविला. बाजारमळ येथील जंक्शनवर पंचायतीतर्फे कचरापेटय़ा ठेवल्या जात असून भटकी गुरे व कुत्री हा कचरा अस्ताव्यस्थ पसरवित आहेत. आसपास राहणाऱया काही फ्लॅटमधील लोक कचरापेटय़ा ऐवजी बाजूलाच उघडय़ावर कचरा टाकत असल्याने तो वेळोवेळी उचलला न गेल्यास कुजून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. बाजूच्या गटारातील सांडपाणीही उघडय़ावर येत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱया पादचाऱयांना व जवळपास राहणाऱया लोकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुजत पडलेल्या कचऱयामुळे डासांची पैदास होऊन रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंचायतीने त्वरित या समस्येकडे लक्ष घालून याठिकाणी कचरा पेटय़ा ठेवणे बंद करण्याची मागणी डॉ. भाटीकर यांनी केली. शिवाय याठिकाणी कचरा न टाकण्याबाबत सूचना फलक उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.