मुंबई
आघाडीवरच्या 10 पैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल भारतीय शेअरबाजारात गेल्या आठवडय़ात 92 हजार 147 कोटी रुपयांनी घटले आहे. टीसीएस व रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मागच्या आठवडय़ात 5 व्यवहाराच्या दिवसात टीसीएसचा समभाग 3.54 टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 2.63 टक्के इतका घसरला होता. टीसीएसचे बाजार भांडवल 43 हजार 574 कोटी रुपयांनी घटल्याचे पाहायला मिळाले तर यापाठोपाठ रिलायन्स भांडवल 35 हजार 500 कोटी रुपयांनी घटले आहे.