प्रतिनिधी /बेळगाव
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी डेनेज वाहिन्याही घालण्याचे काम सुरू आहे. पण सदर वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
शहर आणि उपनगरात जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत वडगाव बाजार गल्ली परिसरात जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले आहे. सदर काम पूर्ण करून महिना उलटला पण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्त्याच्या मध्यभागी खोदण्यात आलेली चर मातीने बुजविण्यात आली आहे. पण सध्या परतीच्या पावसामुळे रस्ता चिखलमय बनला आहे.
संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून या चिखलमय रस्त्यावरून वाहनधारकांना ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावर भाजी विपेते बसत असल्याने नागरिकांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे होते. मात्र एलऍण्डटी कंपनीने याकडे कानाडोळा केला आहे. याचा फटका भाजी विपेते आणि नागरिकांना बसत आहे. जलवाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक रस्ता खराब होण्याची शक्मयता असून, रस्ता खराब झाल्याने वाहनधारक व रहिवाशांना त्रास होणार आहे. त्यामुळे खोदण्यात आलेल्या चरी तातडीने बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.