अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 5 सप्टेंबर 2021, स.11.30
● सोमवारी 224 जणांचा अहवाल बाधित
● एकूण 6,115 जणांची तपासणी
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 3.72
● वाढ मंदावली पण थांबलेली नाही
● शाळा सुरू झाल्याने आनंदली मने
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेले चार दिवस बाधित वाढीचा आलेख 200 च्या खाली राहिला होता. मात्र, रविवारी अहवालात सहा बाधितांच्या मृत्यूने चिंता वाढली असतानाच सोमवारी रात्रीच या अहवालात बाधित वाढीचा आलेख पुन्हा वर चढला असून, तो दोनशेच्या वर गेला. सातारा व कराड तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने थोडी धाकधूक वाढली आहे. सोमवारच्या अहवालात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर देखील वाढलेला असून तो 3.72 टक्के वर गेला आहे.
सोमवारी रात्री अहवालात 224 बाधित
गेली सलग चार दिवस बाकी थोडीच आलेख 200 च्या खाली होता. मात्र, सोमवारी रात्री प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार एकूण 6 हजार 115 जणांची तपासणी करण्यात आली असून, 224 जणांचे अहवाल बाधित आला आहे. बाधित वाढीचा हा आलेख वाढत गेल्यास तो चिंतेचा विषय ठरणार असून, त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक असल्याचा संदेश परिस्थिती देत आहे.
भीतीवर मात करून पुढे जावे लागेल
गत चार पाच महिन्यात कोरोनाचा कहर वाढलेला होता आणि मृत्यू दर वाढल्याने प्रचंड भीती निर्माण झालेली होती. मात्र त्यानंतर आता कोरोना संसर्ग कमी होत असताना जगरहाटीसह सर्व शाळा, महाविद्यालय सुरू झालेले असून यापुढे मास्क, सॅनिटायझर आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर करत वाटचाल करावी लागणार असून, भीतीवर मात करूनच पुढे जावे लागणार आहे. तद्वतच प्रशासनाने देखील या स्थितीत उपायोजना करताना प्रथम लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे गरज असून आकडेवारी त्यापुढे घोळ होऊ नये या बाबतीत सजग राहायला हवे.
शाळा सुरू झाल्याने आनंदली मने
19 महिने तब्बल शाळा बंद राहील यामुळे जी काही स्थिती समाजात निर्माण झाली आणि त्याचा परिणाम ही तेवढ्याच तीव्रपणे जाणवला आहे. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची मने आनंदले असून शाळा महाविद्यालय देखील योग्य ती काळजी घेऊन शैक्षणिक ज्ञानदानाचा यज्ञ जिल्ह्यात सुरू झालेला आहे. घरात राहून आता कोरोना विरुद्ध लढण्यापेक्षा घराच्या बाहेर राहून काळजी घेत हा लढा यशस्वी करावा लागणार आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 21,04,221
एकूण बाधित 2,49,093
एकूण कोरोनामुक्त 2,40,133
मृत्यू 6,098
उपचारार्थ रुग्ण 5,322
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 171
मुक्त 370
मृत्यू 06