अस्वच्छतेमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात : तातडीने स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. बापट गल्ली परिसरातील गटारीची स्वच्छता केली जात नसल्याने गटारी स्वच्छता करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. अस्वच्छतेमुळे बापट गल्लीतील काही रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
शहरातील कचऱयाची उचल करण्याबाबतच्या तक्रारी नेहमीच होत असतात. तरीही कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता करण्यासाठी वर्षाकाठी 25 ते 30 कोटींचा निधी खर्ची घातला जात आहे. तरीही स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बापट गल्ली परिसरातील कचऱयाची उचल व्यवस्थित होत नाही. गटारींमध्ये साचलेला कचरा काढण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. काही वेळा गटारींमधील कचरा काढून बाजूला ठेवला जातो. पण हा कचरा महिना उलटला तरी उचलला जात नाही. परिणामी कचरा पुन्हा गटारींमध्ये वाहून जातो. यामुळे गटारींमधील कचरा स्वच्छ करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. विविध आजारांचा सामना बापट गल्ली परिसरातील रहिवाशांना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना धोकादायक बनले आहे. विविध आजारांमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे बापट गल्ली परिसरातील स्वच्छतेचे काम तातडीने हाती घ्यावे. अन्यथा, आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.