पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला : पाण्याच्या प्रवाहात होणार घट : शेतकऱयांची धास्ती झाली कमी
वार्ताहर /एकसंबा
वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने विविध धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी दूधगंगा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. परिसरातील बंधारेही पाण्याखाली गेल्याने नदीकाठी वाढत्या पाणीपातळीची धास्ती वाढली होती. पण बुधवारपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरु लागल्याने ‘बाप्पा पावले अन् विघ्न टळले’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पाणलोट क्षेत्रातील धरणांमधील पाणीसाठा जवळपास 100 टक्के झाला आहे. त्या क्षेत्रात पाऊस सुरू होताच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली. दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने जनावरांच्या चाऱयाचे गवत पाण्याखाली गेले आहे. गेल्या 24 तासात 17 हजार 500 क्मयुसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक वाढली आहे. राजापूर बंधाऱयातून 83250 क्मयुसेक प्रतिसेकंद पाणी कल्लोळ कृष्णा नदीपात्रात येत आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाऊस बरसतच असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कोयना धरणातून 48,620 क्मयुसेक, कण्हेर 1463 क्मयुसेक, वारणा 6074 क्मयुसेक, राधानगरी 2828 क्मयुसेक, काळम्मावाडी 1500 क्मयुसेक प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येत आहे. आलमट्टी धरणात 91,611 क्मयुसेक पाण्याची आवक होत असून 1,23,196 क्मयुसेकने विसर्ग होत आहे.
विविध धरणांचा पाणीसाठा
कोयना 34 मि.मी, वारणा 20 मि.मी., काळम्मावाडी 20 मि.मी, नवजा 32 मि.मी., राधानगरी 84 मि.मी., महाबळेश्वर 53 मि.मी., कण्हेर 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना 98. 66 टक्के भरले आहे. त्यातून 103.84 टीएमसी पाणीसाठा आहे. वारणा 99.88 टक्के, 34.36 टीएमसी, राधानगरी 96 टक्के, 8.2 टीएमसी, काळम्मावाडी 99 टक्के, 25.19 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.