वार्ताहर/ घटप्रभा
अयोध्या येथे 28 वर्षापूर्वी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना आरोपी करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने सत्याचा विजय झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.
पालकमंत्र्यांनी सदर निकालाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. राजकीय द्वेषातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप दाखल करण्यात आले असल्याचे या निकालावरून स्पष्ट होते. मात्र न्यायालयाने सर्व बाबींचा अभ्यास करून याप्रकरणी निकाल दिला असल्याचे त्यांनी सांगितले.