ऑनलाइन टीम / मुंबई :
डाँ बाबसाहेब आंबेडकरांचं स्मारक दोन वर्षात पूर्ण करणं शक्य आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडय़ाची पाहणी शरद पवार यांनी आज केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, कंत्राटदार, अधिकाऱयांनी काम मनावर घेणं गरजेचं आहे. तसेच गर्दीच्या काळातही स्मारकाची काळजी घ्यावी लागेल. या स्मारकाला आणखी विलंब होऊ नये अशी याची काळजी घ्यावी लागेल असाही सल्ला शरद पवार यांनी दिला.
हे स्मारक पहाण्यासाठी बाहेरचे लोक आले पाहीजेत असंही ते यावेळी म्हणाले.