वार्ताहर / हरमल
बामणभाटी आगरानजीकच्या शेतीजमिनीत पाणी साचून राहिल्यास आठ दिवस उलटून गेले. सध्या शेतीची लागवड करणे जवळजवळ कठीण, तर रस्ता फूटभर पाण्याखाली असल्याने नागरिकांची बरीच कुचंबणा झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या स्थितीची उपजिल्हाधिकारी, मामलेदार, मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे तसेच पंचायत मंडळाने पाहणी केली होती. मात्र अद्याप काहीही शक्मय झाले नसल्याने त्यांची पाहणी एक ’फार्स’ होता का व ती ठरू नये, अशी चर्चा रंगली आहे.
गेली कित्येक वर्षे तुर्कीण बामणभाटी आगरानजीक स्थानिक शेतकरी दुबार शेती, मिरची व हलसंदे वगैरेची लागवड करायचे.त्याठिकाणी साधारण,शंभर मीटरचा रस्ता सखल भागांत होता व पावसाळय़ात रस्ता पूर्णत पाण्याखाली जायचा. ह्या समस्येची दखल घेऊन,गेल्या वषी हरमल चोपडे रस्त्याचे रुंदीकरण व भराव टाकून उंची वाढविली होती.मात्र ते काम उरकताना,पाणी जाण्याची दोन मीटरची वाट (मुशी)बंद झाल्याने यंदा शेत जमिनीत पाणी तुंबून राहिल्याचे ठाकूर व अन्य शेतकऱयांनी सांगितले.त्यांच्या तक्रारीनुसार पाहणीचा कार्यक्रम झाला मात्र अद्यापही शेती व रस्ता पूर्णतः पाण्याखाली असल्याने नागरिकांनी शासनाच्या कारभाराचा फार्स म्हटला आहे.
दरम्यान,शेतकऱयांशी संपर्क साधला असता,त्यांनी प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहे.मात्र शेती करण्यास प्रोत्साहन देणाऱया सरकार व प्रशासकीय अधिकारी वर्गाने ठोस उपाययोजना करण्याची आशा असल्याचे त्यानी सांगितले.सुपीक शेतजमीन विनालागवड ठेवणे शेतकऱयांना करमत नाही.प्रशासकीय अधिकाऱयांनी ह्या प्रश्नी न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रस्ता पाण्याखाली—-देऊळ वाडा रस्ता सध्या पूर्णत फूटभर पाण्याखाली असून,दुचाकी,चारचाकी वाहन मालकांना तसेच पादचारी लोकांना मनस्ताप सोसावा लागतो.विशेषतः भगिनींना पाण्यामुळे तीन किलोमीटरचा द्राविडी प्राणायम करावा लागतो.आठ दिवस पाणी रस्त्यावरच असल्याने रस्ता निसरडा बनला असून पायी जाणे जीवांवर बेतू शकते असे नागरिकाने सांगितले.
तरी ह्या दोन दिवसांत सरकारी पातळीवरन योग्य सहकार्य मिळेल अशी आशा स्थानिक शेतकरी वर्गातून केली जात आहे.