नवी दिल्ली
शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी बायजू यांनी अलीकडेच मोठय़ा गुंतवणूकदारांच्या साथीने 2 हजार 500 कोटी रुपये उभारले असून भारतातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी म्हणून नोंदली गेली आहे. सदरची गुंतवणूक कंपनीने युबीएस ग्रुप, झुमचे संस्थापक इरीक युआन, ब्लॅकस्टोन, अबुधाबी सॉवरिन फंड एडीक्यू आणि फिनीक्स रायजिंग यांच्यामार्फत उभारली आहे. एप्रिलनंतर 16.5 अब्ज डॉलर्सपर्यंत रक्कम उभी केल्याने बायजू आघाडीवर राहिली आहे. भारतात या पाठोपाठ पेटीएम ही 16 अब्ज डॉलर्ससह दुसऱया स्थानी आहे.