ही स्वारस्यपूर्ण घटना कानपूरमधील आहे. अनेकांना अन्य लोकांची लग्ने ठरवून देण्यात आणि लग्नात स्वतः मिरविण्यात रस असतो. लग्नेच्छुक तरुण-तरुणींचा एकमेकांशी परिचय करून देणे. त्यांच्या कुटुंबीयांबरोबर चर्चा करणे आणि विवाह ठरवून देणे आदी कामे हे लोक हौसेने करतात. लग्नात मग त्यांना मोठा मान दिला जातो. कानपूरमधील अशाच एका मध्यस्थावर वेगळाच प्रसंग गुदरला. त्याने एका कुटुंबातील कन्येशी अन्य कुटुंबातील युवकाचा विवाह ठरवून दिला. नवरा-नवरींची पसंती, दाखविण्याचा कार्यक्रम, देण्या-घेण्याचे व्यवहार सारे काही ठरले. लग्नाच्या दिवशी मुलीकडचे वऱहाडी विवाहस्थळी उपस्थितही झाले. पण, ऐनवेळी नवरा मुलगाच कोठे गायब झाला. आता मध्यस्थावर स्वतःची प्रति÷ा जपण्याची वेळ आली. अखेरीस त्याने वऱहाडी बनून आलेल्या आपल्या भावालाच ‘दुल्हा’ बनण्याचा आदेश दिला.
विवाहाच्या ठिकाणीच पंधरा-वीस मिनिटात मुलीकडच्यांनी या नव्या दुल्हय़ाला पसंत केले आणि थाटामाटात त्याचा विवाह या कुटुंबातील कन्येशी लावून देण्यात आला. विवाहासाठी उपस्थित असणाऱयांपैकी अनेकांच्या लक्षातही ही बाब आली नाही. इतकेच नव्हे तर ज्या मुलाबरोबर लग्न ठरले होते, त्या मुलाच्या घरची मंडळीही या विवाहसोहळय़ात सामील झाली. कारण त्यांनाही आपला मुलगा ऐनवेळी पळून गेल्याची बाब लपवून ठेवायची होती. अशाप्रकारे संपन्न झालेल्या या विवाहाची चर्चा आता पंचक्रोशीत सर्वत्र होत आहे. मूळचा नवरा मुलगा गायब झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली होती. त्यामुळे हा सर्व प्रकार नंतर उघडकीस आला.