प्रतिनिधी/ सातारा
सामाजिक बांधिलकीचं वेड हे रक्तातच असाव लागतं. बारामतीच्या ( जि. पुणे ) घनश्याम मुकुंद केळकर या अवलियाने समाजात आरोग्य जागृतीचे भानं निर्माण करणे वेडातून महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरची जनारोग्य महापरिक्रमा मोहिम सुरू केली आहे . हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाया रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया पाचाड गावातून प्रारंभ झालेल्या पायी मोहिमेचे पंधरा दिवसानंतर सातायात स्वागत झाले .
पाचाड -नाते -महाड – पोलादपूर -वाडा कुंभरोशी -नावली -अंबेघरे – मेढा – कळंबे या मार्गाने घनश्याम केळकर शनिवारी सातायात दाखल झाले. आशा सामाजिक संस्था व आरोग्यदान चळवळीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. सातारा – नागठाणे -उंब्रज – मल्हार पेठ – पाटण मार्गे चांदोलीकडून त्यांची परिक्रमा आंबा घाट विशाळगड पन्हाळा करून 24 नोव्हेंबरला कोल्हापूरला पोहचणार आहे .
मूळचे माध्यम क्षेत्राशी निगडित असणारे केळकर या मोहिमेविषयी आपली भूमिका मांडताना म्हणाले, ” अकस्मात आजारपणामुळे उद्भवणारे खर्च आणि त्यामुळे दारिद्रयाच्या खाईत लोटली जाणारी कुटुंबे त्या कुंटुबातील व्यक्तींना रुग्ण सांभाळणे आणि अपचारासाठी खर्चाची तरतूद करणे या अवघड कसरती कराव्या लागतात .समाजात अशा लोकांना मदत करू इच्छिणाया दानशूरांची संख्याही मोठी आहे. गरजू आणि दानशूर यांची गाठ घालून गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी शंभर कोटीचा सामाजिक आरोग्य विमा उभा करणे हे मोहिमेचे उदिष्ट असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले .आरोग्य क्षेत्रात काम करणाया कार्यकर्त्यांना एकत्र करून सक्रीय योगदान देणेकरिता www.aarदुब्adaaह.दु ही वेबसाईट सुरू करण्यात आली असून गरीब रुग्णांची मदत करणे हा या परिक्रमेचा हेतू आहे.
344 दिवसाच्या या पदभ्रमण मोहिमेचा टप्पा चार हजार किलोमीटरचा असून ही मोहीम सातारा सांगली सोलापूर मराठवाडा विदर्भ खानदेश नाशिक मुंबई पुणे औरंगाबाद नगर जिल्हयाचा प्रवास करून 22 सप्टेंबर रोजी या मोहिमेची सांगता छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणार आहे . सातारा येथे विविध मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू असून स्वयंसेवक व दाते यांचा संच उभा करण्याचा मानस घनश्याम केळकर यांनी बोलून दाखविला. या आरोग्य दान चळवळीत रुग्णांच्या सेवेसाठी इच्छुकांनी निश्चित सहभागी व्हावे असे आवाहन आरोग्यदान चळवळ व आशा सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे .