निसर्गाची सुंदर नक्षी स्पष्ट करणारा
उदय सावंत / वाळपई
एका बाजूने उष्णतेचें प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे . यामुळे असह्य होणारा या उष्णतेमुळे नागरिक मोठय़ा प्रमाणात सत्तरी तालुक्मयातील नदीच्या ठिकाणी आंघोळीसाठी जाताना दिसत आहे. सध्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र स्वरुपाची समस्या निर्माण झालेली आहे. सत्तरी तालुका हा समृद्ध जंगल परंपरेने नटलेला आहे .या तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात वाहणारे प्रपात यामुळे सत्तरी तालुक्मयाच्या निसर्गात प्रचंड प्रमाणात भर पडलेली आहे .एका बाजूने निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची समस्या नदीमधील जलस्त्राsत आटत असतानाच दुसऱया बाजूने सत्तरी तालुक्मयातील वांयगीणी गावापासून अवघ्या अंतरावर असलेल्या वाईंगणी धबधबा हा बारामाही वाहताना दिसत आहे।
सध्यातरी हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून दररोज मोठय़ा प्रमाणात निसर्गप्रेमी व धबधबाप्रेमी या धबधब्यावर भेट देऊन थंड पाण्याचा आस्वाद घेताना दिसत आहे .यामुळे वनखाते व पोलिस यंत्रणेवर मोठय़ा प्रमाणात ताण दिसत असून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व निसर्गावर भरभरून प्रेम करणाऱया निसर्गप्रेमींच्या या निसर्गाच्याप्रेमामुळे ही यंत्रणा पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र समोर येत आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील बारामाही वाहणारे अनेक स्वरूपाचे धबधबे आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे जागतिक स्तरावर सुंदर धबधब्याचे चित्र निर्माण करणारा वज्रपोया धबधबा हा जगातील सर्वात सुंदर धबधबा असल्याची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे सावर्डे पंचायत क्षेत्रात येणाऱया नानोडा गावापासून वांयगीणी गावाच्या नजीक असलेल्या वांयगीणी धबधबा सध्यातरी बारामाही वाहताना दिसत आहे. थंड पाणी व धबधब्याच्या बाजूने निर्माण झालेली निसर्गाची सुंदर नक्षी यामुळे या निसर्गातील धबधब्यांचे अनेकजणाना धुंद केलेले आहे. गेल्या जवळपास दीड महिन्यापासून हा धबधबा प्रचंड प्रमाणात विकसित झालेला असून यासंदर्भाची वाच्यता झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देताना दिसत आहेत वाईंगीणी हा गाव पूर्णपणे जंगलाच्या मध्यवर्ती परिसरात वसलेला आहे. सार्वजनीक विकासापासून बऱयाच अंतरावर असलेल्या या गावाच्या शेजारी व सभोवताली परिसरामध्ये समृद्ध अशी जंगल परंपरा असून हे जंगल संरक्षित असल्यामुळे नैसर्गिक स्तरावर पाण्याचे स्तोत्र निर्माण होऊन हा धबधबा निर्माण झालेला आहे. यामुळे बारामही या धबधब्याला पाणी येत असून आजही मोठय़ा प्रमाणात हा धबधबा कोसळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. धबधब्याचे ठिकाणी असलेले काळोत्री दगड हे निसर्गातील सुंदरतेच्या चित्रांमधील महत्त्वाचा घटक असून निसर्गाची सुंदर नक्षी निर्माण करणार आहेतळ.हा धबधबा म्हणजे सत्तरी तालुक्मयाच्या नैसर्गिक श्रीमंतीचा मानाचा तुरा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वांयगीणी गाव हा जरी सत्तरी तालुक्मयात व म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात येत असलातरी त्याच्या शेजारी असलेल्या भीमगड अभयारण्यात मोठय़ा प्रमाणात वाघाचा संचार असल्याचे समोर आलेले आहे .त्यामुळे सदर धबधब्यावर जात असताना निसर्गप्रेमींनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे .
गेल्या काही महिन्यांपूर्वी सत्तरी तालुक्मयातील गोळाशली या ठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाला होता .यामुळे या सुंदर धबधब्यातून कोणत्याही प्रकारचा अनर्थ होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या म्हादई अभयारण्याचे कर्मचारी या संदर्भात विशेष स्वरूपाची खबरदारी घेत असून तरीसुद्धा निसर्गप्रेमींनी कोणत्याही प्रकारचा आताताईपणा होणार नाही याची विशेष दखल घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.