नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएससी आणि इतर केंद्रीय शिक्षण संस्थांनी बारावीची यंदाची परीक्षा रद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मार्कस् निर्धारित करण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरविलेले आहेत. या निकषांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने यासंबंधीची योजना काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती. कोरोनाच्या दुसऱया उद्रेकाची तीव्रता लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने बारावी मार्कांच्या (गुणांच्या) निकषांसंबंधी विचारणा केली होती.