प्रतिनिधी /बेंगळूर
परीक्षेशिवाय बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता या विद्यार्थ्यांचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने बारावीतील प्रेशर्स आणि रिपिटर्स विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना अकरावी आणि दहावी वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. निकालपत्रक तयार करण्यासाठी निकषही ठरविले होते. आता पदवीपूर्व शिक्षण खात्याने निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून मंगळवार दि. 20 जुलै रोजी तो जाहीर केला जाणार आहे. ग्रेडऐवजी दरवर्षीप्रमाणे गुणांच्या स्वरुपात निकाल दिला जाणार आहे, अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालक स्नेहल यांनी दिला आहे.खात्याच्या http://pue.kar.nic.in या बेवसाईटवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे.