एआयडीएसओचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. असे असताना अचानकपणे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यावधी परीक्षा घेण्याबाबत आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर तणाव येणार असून बोर्डऐवजी कॉलेजच्या माध्यमातूनच या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक स्टुडन्ट ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवडय़ात घ्याव्यात. याचबरोबर आता घेण्यात येणाऱया मध्यावधी परीक्षा या कॉलेजच्या माध्यमातूनच घेतल्या जाव्यात. 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत या परीक्षा घेण्यासाठी कर्नाटक बोर्डाने आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्यस्तरावर प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर तणाव येणार आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना उशिराने कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. यातच अजून पूर्ण शिक्षणही दिले गेले नाही. असे असताना बोर्डातर्फे ही परीक्षा घेतल्यास विद्यार्थी तणावाखाली येणार आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून पूर्वीसारख्याच कॉलेज पातळीवरच या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी करून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत.