प्रतिनिधी/मुंबई
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला प्राधान्य देत अखरे राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कोरोना 19ची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसर्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेता परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. 12 वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा अशी राज्य सरकारमार्फत पेंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत एकसमान धोरण निश्चित करावे, अशीही पेंद्राकडे मागणी केली होती.
मागील 14 महिने विद्यार्थी अभ्यासाच्या व परीक्षेच्या तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी व राज्यातील विविध परीक्षा मंडळांच्या मूल्यमापनामध्ये एकसुत्रताअसावी यासाठी राज्य सरकारनेही बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठविण्यात आली होती. सध्याच्या कोविडच्या काळात सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जातात. त्यानुसार बारावीच्या परीक्षा संदर्भातील फाईल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविण्यात आली होती. या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
यांनीही घेतला बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
करोनाच्या प्रादुर्भावामुळे पेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यापाठोपाठ ‘सीआयएससीई`नेही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता हे सर्वात जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारनेही या शैक्षणिक वर्षातल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पेंद्राच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पात्र विद्यार्थी आणि शिक्षकांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा द्या
भविष्यात होणार्या बोर्डाच्या परीक्षा संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पात्र विद्यार्थी यांना फ्रन्ट लाईन वर्करचा दर्जा द्यावा व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी केली आहे. याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री यांनी पेंद्र सरकारकडे मार्च 2021 मध्ये अशी मागणी केली होती. या मागणीचा पुनरुच्चार गायकवाड यांनी केला आणि सर्व संबंधितांना आदेशित करण्याबाबत पेंद्र सरकारला पुन्हा विनंती केली.