म्हापशात गोमंतक भंडारी बार्देश तालुका समितीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव
प्रतिनिधी/ म्हापसा
गोमंतक भंडारी समाज बार्देश तालुक्याला विश्वासात न घेता केंद्रीय भंडारी समाजानी परस्पर नवीन बँकपासबूक उघडून पैशाचा व्यवहाराचा ताबा आपल्याकडे ठेवला तो पुन्हा बार्देश तालुका समितीकडे सुपूर्द करावा. बार्देश तालुका भंडारी समितीची त्वरित नवीन समिती निवडणूक घ्यावी. समाजाच्या घटनेत बदल करून त्वरित अमलबजावणी करावी असे महत्त्वाचे 3 ठराव म्हापसा येथे प्रगती संकूलच्या सभागृहात घेण्यात आले. बैठकीत बार्देश तालुक्याचे अध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी म्हापसा बार्देश तालुक्यात उभारण्यात आलेल्या प्रगती संकूलासाठी आलेल्या खर्चाची माहिती समाज बांधवांना देऊन त्यावर मान्यता मिळाली. आपल्याकडून 1 कोटी 20 लाखाची अफरातफर झाल्याचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. समाज सभागृह बांधकामाचे सर्व व्यवहार पारदर्शक असून त्यात एक रुपयाचीही अपरातफर नाही. काहीजणांनी आपल्यास मुद्दामहून बदनाम करण्यासाठी आपल्यावर आरोप लादल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व हिशोब पुस्तकी स्वरुपाने छापून तो मसाज बांधवांना देण्यात आला. हिशोबाची सर्व बिले कार्यालयात असून ती कधीही कुणी पडताळून पाहू शकता. आपण हे संकूल उभारण्यासाठी तळागाळात जाऊन निधी आणला. हा एवढा मोठा सभागृह उभारून नाहक आपल्यास चोर ठरवू नका. त्यांनी यावेळी आपल्या आरोपांचे खंडन केले.
म्हापसा प्रगती संकूलात बार्देश तालुका प्रगती संकूलाचा हिशोब सादर करण्यासाठी अध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी खास बैठक बोलावली होती. या बैठकीला समाजाचे बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आपण यापूर्वी सीए, ऑडीट करून हिशेब अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केलेला आहे तो सर्वप्रथम हॉल हाती बांधम्यास घेतले तेव्हा 8 लाख 30 हजार हाती होते. टाईल्स आदी बांधकाम करण्यास मदत केली त्यांची निधी 38 लाख 99 हजार होते. देणगी स्वरुपात 1 कोटी 58 लाख आले. इतर जमा मिळून 1 कोटी 1 लाख आदी मिळून 2 कोटी 11 लाख 35 हजार जमा झाले. हे सभागृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी झाले. हे संकूलासाठी उद्घाटनापूर्वी 2 कोटी 7 लाख 71 हजार रुपये खर्च आला त्यावेळी 42 लाख रुपये आम्ही सामानाचे जेमे आहे. व्यासपीठासाठी, कंत्राटदार, स्टील यार्ड आदीची बाकी आहे. लिफ्टचे 81 हजार बाकी आहे. पैकाणे 73 हजार, पेंटरचे अडीच लाख असे बारीक सारीक मिळून देणे आहोत. पैकी थोडे थोडे करून गिल्याने आता 19 लाख 58 हजार रुपये देणे बाकी आहेत. हॉलसाठी 59 लाख 11 हजार 711 भाडेस्वरुपात आले. 12 लाख केंद्रीय समितीनी परस्पर आपल्याकडे बँकेत जमा केले आहे. 19 लाखातून 12 वजा केल्यास 7 लाख रुपये देणे बाकी राहिले.
मात्र हा हिशेब बाजूला ठेवून आपल्या विरोधात चोर, अपरातफर आदी आरोप लावण्यात आले. हे आरोप आपल्यावर काय? इतके समाजासाठी करून मला ही परत फेड इतकेच नव्हे तर आपल्याकडील पॉवर ऑफ अटर्नीही काढून घेतली असे झाल्यास समाजाचे काम पुढे कसे जाणार. मी हा सर्व हिशोब सर्वांसमोर ठेवला असून पुढे काय निर्णय घ्यायचा तो समाज बांधवांनी घ्यावा मात्र यासाठी नाहक नावाची बदनामी नको. सर्व हिशोब पारदर्शक असल्याचे श्री कांदोळकर यांनी सांगितले.
अपरातफर प्रश्न इकडेच संपवा
केंद्रीय समितीमधील सल्लागार महानंद अस्नोडकर यावेळी बोलताना म्हणाले की, आपण समाजासाठी सदैव पुढे जाणार आहे. या समाजाची सर्वसाधारण सभा घ्यावी म्हणून अनेकदा आग्रह केला मात्र आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांन ाrकेला. बार्देश तालुका स्वतंत्र असून या समाजाच्या बांधवांनी आपल्यास पाहिजे तो अध्यक्ष निवडावा. अफरातफर हा विषय इथेच संपवा आणि आपल्या समाजाला काय फायदा होणार याकडे लक्ष द्या असे ते म्हणाले. समाज बांधव शशिकांत घाडी म्हणाले की, कांदोळकर यांनी हिशोब सादर करून आता त्यांना आपण स्वच्छ असल्याचे प्रामाणपत्र देण्याची गरज नाही. बार्देश तालुक्याच्या संकुलासाठी जे काही अद्याप पैसे देणे बाकी आहे ते केंद्रीय समितीनी द्यावे. जेव्हा समिती एसर्ट घेते तेव्हा लायबिलेटीही त्यानीच घ्यायला पाहिजे. रंजन मयेकर म्हणाले, शत्रुत्व बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावे. सुधीर यांनी तळागाळात जाऊन या संकुलासाठी निधी गोळा केला आहे. ते अभिनंदनास पात्र आहे.
पॉवर ऑफ अटर्नी काढताना समितीला विश्वासात घेतला काय?
माजी उपाअध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी सुधीर कांदोळकर यांचे अभिनंदन करत म्हापसा प्रगती संकुलासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज सर्वजण सुधीरवर आरोप ठेवत आहे मात्र त्याची हकालपट्टी करण्यासाठी अवघे दोघेच वावरत आहेत. सुधीर यांची पॉवर ऑफ अटर्नी कुणी काढली हे करीत असताना सर्वांना विश्वासात घेतले काय? बार्देश तालुक्याचा हिशोब केंद्रीय समिती मागते. माग सालसेत समाजाबद्दल गप्प का? ही समिती असताना केंद्रीय समितीनी बँकेचा नवीन पासबूक परस्पर कसा उघडला, जो काही अद्याप हिशोब कर्ज आहे तो कोण देणार. सुनील नाईक पूर्वीचे पैसे न देता ते बोंबाबोंब करतात. त्यांच्यावर कारवाई का नाही. पॉवर ऑफ अटर्नी वा नवीन बँक बुक करताना इतरांना विश्वासात का घेण्यात आले नाही असा प्रतिसवाल त्यांनी केला.
सुधीर कांदोळकर अभिनंदनास पात्र
प्रा. शशिकांत कांदोळकर यांनी म्हापशात भव्य दिव्य प्रगती संकूल उभारल्याबद्दल सुधीर कांदोळकर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले केंद्रीय समितीनी समाजाच्या घटनेबद्दल बदल घडवून आणले पाहिजे. सुधीर कांदोळकर यांची पॉवर ऑफ अटर्नी काढण्यात आली हे योग्य नाही. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा. नाहक आरोप प्रत्यारोप करू नये. असे त्यांनी सांगितले. अमृत आगारवाडेकर यांनी सांगितले की, म्हापशात प्रगती संकूल उभारण्याबाबात सुधीर कांदोळकर यांचे नाव इतिहासात जमा राहाणार आहे. त्यांचे नाव बदनाम करणाऱयांचा आपण निषेध करतो असे ते म्हणाले. सुधीरमुळे हे सभागृह उभा झाले. आरोप करणारी केंद्रीय समिती हे बांधताना कुठे होती. जाहीर सभा घेऊन केंद्रीय समितीने आरोप करावे असे आवाहन दिपक नाईक यांनी केले. जयवंत नाईक म्हणाले, सुधीरनी तळागळाला जून या संकूलासाठी पैसे उभे केले त्यांच्या कामाना तोड नाही. केंद्रीय समितींनी नाहक आरोप करू नये. समितीने घटनेत बदल करण्यात येईल असे सांगितले होते ते अद्याप का झाले नाही. आपल्याला मते मिळावी म्हणून हे काही लोक आमच्या बांधवांचा वापर करतात असेही ते म्हणाले.
समितीची निवड
दरम्यान बार्देश तालुका भंडारी समाज व केंद्रीय समिती यांच्यामधील वाद हिशोब आणि इतर गोष्टीवर चर्चा करण्यासाठी यावेळी एक समितीची निवड करण्यात आली त्यात माजी सभापती उल्हास अस्नोडकर, प्रा. श्याम कवठणकर, सदानंद कवठणकर, जयवंत नाईक, जनार्दन ताम्हणकर, ऍड. शैलेश वेंगुर्लेकर, सुभाष कवठणकर, प्रा. शशिकांत कांदोळकर, शशिकांत घाडी, शिवानंद शिरोडकर, दिक्षा कांदोळकर, निलम नाईक, पल्लवी दाभोळकर यांचा समावेश आहे.
सूत्रसंचालन प्रा. सुभाष कौठणकर, स्वागत शशिकांत कांदोळकर, आभार रोहन कळंगुटकर यांनी मानले. श्री रुद्रेश्वर देवाच्या फोटोला माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
अध्यक्षांचे नाव बदनाम करणाऱयाची हकालपट्टी करा
समाजाचे जेय्ष्ठ नागरिक सदानंद कवळेकर म्हणाले की, चारुदत्त पणजीकर, संजय बर्डे, सुदेश किनळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजाचे अध्यक्ष सुधईर कांदोळकर यांचे नाव बदनाम केले त्याचबरोबर बार्देश तालुका भंडारी समाजाचे नाव बदनाम केल्याने त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली. कांदोळकर यांनी हे भव्यदिव्य संकूल उभारले त्यामुळे अध्यक्ष सुधीर कांदोळकर अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. जे आम्ही आमच्या कारकीर्दीत करू शकलो नाही ती आमची इच्छा होती ती सुधीर कांदोळकर यांनी पूर्ण केली अशी माहिती यावेळी माजी अध्यक्ष दयानंद नाईक व संजय नाईक यांनी दिली.