दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / पणजी
सोमवारी पडलेल्या यावर्षीच्या पहिल्या पावसातच बाल भवन, मिरामार रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे काल महापौर उदय यांनी जीएसआयडीसीच्या व स्मार्ट सिटीच्या आभियांत्रिक टीमने या ठिकाणी पाहणी केली.
दरम्यान येथील बालभवन जवळील व या भागात असलेली जवळपास असलेली गटारे पूर्णपणे मातीने भरलेली आहेत. तसेच जीसआयडीसीतर्फे बालभवन येथे लागून चूकीच्या पध्दतीने पदपाथ बांधण्यात आल्यामुळे येथे अधिक अडचण येत आहे. त्यामुळे येथे एकतर पदपाथ फोडून काम करावे लागणार किंवा रस्ता फोडून काम करावे लागणार आहेत. असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे मिरामार ते दोनापावला रस्ता खासकरुन भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर समाधी कडे कुठल्याही प्रकारचे पूर्ण नियोजीत गटार येथे दिसून येत नाही, त्यामुळे पावसाचे पाणी सर्वात जास्त प्रमाणात या रस्त्यावर साचले जात आहे. असेही मडकईकर यांनी सांगितले.
सध्या स्मार्ट सिटीचे व मनपाचे अभियंते यावर काम करत आहे. येणाऱया दोन दिवसात या समस्येवर तोडगा काढण्यात येणार आहे. असे उदय मडकईकर यांनी अधिक माहीती देताना सांगितले.