प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या संकटात अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांचे जगण खूप हलाखीचे बनले आहे. मात्र, माणुसकीचा धर्म पाळणारी माणस आलेल्या संकटात मार्ग काढून वाटचाल करत असतात. असाच उपक्रम बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. त्यांनी गरजनिधी योजना हा उपक्रम बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून दि.1मे पासून आणला जात आहे.
कोरोनाचे संकट जगावर कोसळले आहे. या संकटात प्रत्येकजण भरडून निघत आहे मग तो गरीब असेल किंवा श्रीमंत. गरीबांच्याबाबतीत खूपच भयानक अवस्था आहे.ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यापुढे जगायच कस हा प्रश्न आहे.त्यामुळे बालाजी पतसंस्थेच्यावतीने रिक्षावाले काका, घरकामवाल्या मावशी, हातगाडीवाले चालक, मोलमजुर दादा, भाजीवाले मामा, फळवाले भाऊ, खाजगी नोकरदार, छोटय़ा व्यवसायिक मित्रांनो सध्या कोरोनाच्या काळात आर्थिक कुचंबणा सांगता ही येत नाही अन बोलता ही येत नाही कोणी विश्वास ठेवत नाही पण आम्ही ठेवतो, या आर्थिक विवनचनेतुन बाहेर पडण्यासाठी एक सतप्रयत्न नकी करू.म्हणूनच घेऊन येत आहोत, 1 मे पासून गरज निधी योजना.या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली जाणार असून हा उपक्रम राजेंराजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात येत आहे.