वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथील पाटील गल्लीमध्ये गटारीच नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी येथील रस्त्यावरील पाणी अद्याप ओसरले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाट शोधावी लागत आहे. अद्याप गटारी न बांधल्याने दरवषी पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहते. वास्तविक पाहता येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाय योजना राबवणे गरजेचे होते. मात्र याकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. बरेच दिवस पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
परिसरातील नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीला अनेकवेळा कळविले. तरी देखील पाण्याचा निचरा करण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.