कोगनोळी : शांतीविद्या ज्ञान संवर्धन समिती सांगली यांच्यावतीने श्रीक्षेत्र बाहुबली कुंभोज (महाराष्ट्र) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे कर्नाटकाच्या प्रवेशद्वारावर कोगनोळी येथे निवृत्त शिक्षक बाबासाहेब चौगुले, अमर चौगुले यांनी स्वागत केले. बाल ब्रह्मचारी अजित भैय्याजी, अमोल भैय्याजी, राहुल भैय्याजी, तात्या भैय्याजी, धर्मा अनुरागी, अभयकुमार बरगाले यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक काणे यांच्यासह सुमारे 100 सायकलस्वार 16 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या सायकल रॅलीत सहभागी झाले आहेत. सायकल चालवा पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा देश वाचवा, जगा आणि जगू द्या, असा संदेश देत ही सायकल रॅली कन्याकुमारीकडे मार्गस्थ झाली. यावेळी अभिजीत चौगुले, विठ्ठल कोळेकर, राजाराम चौगुले, महावीर करडे-पाटील, वैभव चौगुले यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते.
Previous Articleतालुक्मयात निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला
Next Article जमखंडीत अर्जुन कोरटकर स्मृतिदिन गांभीर्याने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.