24 कॉलसेंटर सुरु करा : विलगीकरणाचे नियोजन सुरु : बाहेरुन येणाऱयांना होतोय विरोध
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन तिसऱया चरणात सातारा जिल्हय़ात वाढलेली कोरोना बाधितांची संख्या आणि नियमांतील विविध बदलांमुळे परराज्यात, जिल्हय़ात अडकलेल्यांची ने-आण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, पुणे व मुंबईवरुन येणारे बाधित आढळून येत असल्याने जिल्हय़ात धोका वाढू लागला आहे. बाहेरुन येणाऱयांना गावागावात विरोध होत असल्याचे समोर येत असल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्हय़ात सुरु असलेल्या उपाय योजनांच्या आढाव्याबरोबरच बाहेरुन येणाऱयांचे आव्हान कसे पेलायचे यावर चर्चा झाली.
प्रशासनाने मायक्रो कंटेन्मेंट झोन करताना जिल्हय़ात थोडी शिथीलता दिली असली तर होणारी गर्दी धोक्याचे संकेत देत आहे तर आता शासनाने परराज्यातून तसेच जिल्हय़ातून येणाऱया नागरिकांना परवानगी देण्यास आरंभ केला आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱया लोकांना काही गावांमध्ये विरोधही होत आहे. या पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली.
या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे जिह्यातील नागरिक विविध कारणांमुळे बाहेरच्या जिह्यात अडकून पडले आहेत. हे नागरिक जिह्यात आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे.
कोरोनाचा कराड मध्ये प्रादुर्भाव वाढत आहे, ही प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, या आजारावर खात्रीशीर असे औषध नाही, सुरक्षित अंतर ठेवणे हाच यावर उपाय आहे. सामजिक दायीत्व म्हणून विविध संस्था अन्नधान्य वाटप करीत आहेत. शासनाने शिवभोजन केंद्राची व थाळींची संख्या वाढवली असून ही थाळी अवघ्या 5 रुपयांमध्ये गरजुंना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
बाहेरुन येणाऱयांचे प्रथम विलगीकरण
मुंबई-पुण्याहून आलेल्या नागरिकांची संख्या प्रशासनाकडे आहे. परजिह्यातून येणाऱया नागरिकांना विलगीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. तसेच परराज्यातील नागरिकांची नोंदणी सुरु असून राज्यांनी होकार दिल्यानंतर रेल्वेही सोडण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
24 तास कॉलसेंटर सुरु करा
आपल्या जिह्यातील लोक पंजाब, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक अशा परराज्यात अडकलेले आहे, त्यांना जिह्यात आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना करुन खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींना माहिती होण्यासाठी 24 तास कॉलसेंटर सुरु करा. कोरोना संदर्भात नगरसेवकांना, सरपंचांना, पोलीस पाटलांना विश्वासत घेऊन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकप्रतिनिधींकडून उपाय योजनांबाबत सूचना
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपापसात समन्वय ठेवावा. जे बाहेर जिह्यातून नागरिक येणार आहेत त्यांचे विलगीकरण करताना गावाला विश्वासत घेवून करावे. तसेच जिह्यात प्रवेश देताना अतिशय काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी व्हावी. जिह्यातील मोठे हॉटेलही विलगीकरणासाठी उपलब्ध करुन द्यावेत, ज्याची ऐपत असेल अशी लोकं तिथे राहतील अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. तसेच निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे यंत्रणा उभी केली जाते तशा प्रकारची यंत्रणा उभी केल्यास विलगीकरण केलेल्या नागरिकांवर सहजपणे लक्ष ठेवता येईल व त्यांना वेळेत उपचार केले जातील यासह अनेक सूचना यावेळी उपस्थित खासदारांसह आमदारांनी केल्या.
सर्वांनीच काळजी घेण्याची गरज
जिल्हय़ात पाहता रुग्ण संख्या वाढली. त्यातील काही कोरोनामुक्त घरीही गेले आहेत. मात्र वाढणारी रुग्ण संख्या भीतीत भर घालत आहे. त्यात आता बाहेरुन येणाऱया नागरिकांचे नियोजन करताना सर्वांनीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून योग्य पध्दतीने नियोजन करुन त्यांचे विलगीकरण करावे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शिस्त, नियम पाळण्याबरोबरच सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, गर्दी करणे टाळणे या गोष्टी महत्वाच्या असून सर्वानीच याची काळजी घेत या आव्हानाला परतवून लागवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.