शहरवासियांची बनू लागली भावना, शहरात फैलाव होऊ नये यासाठी प्रशासन झाले गतीमान, शहरवासीयांची अजून ही साथ हवी
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाची नुसतीच सुरुवात झाली तेव्हा शहरालगतच्या खेड गावच्या परिसरात 65 वर्षीय वृद्ध कॅलिफोर्निया येथून आल्याने त्यास कोरोना झाल्याने शहरवासीय भयभीत झाले होते.त्या रुग्णाच्या नंतर सातारा शहरात कुठे ही रुग्ण आढळून आला नव्हता मात्र, गेल्या चार ते पाच दिवसात शहरात एकेक आकडा चढून 5 रुग्ण झाले आहेत.यापैकी एक रुग्ण हा जिल्हा रुग्णालय काम करणारा तर उरलेले रुग्ण हे बाहेरच्या जिह्यातून आलेले आहेत.त्यामुळे सातारा शहरात बाहेरून आलेल्यांनीच कोरोना आणल्याची सातरकरांची भावना बनू लागली आहे.शहरात फैलाव वाढू नये यासाठी प्रशासन आणखी गतिमान झाले असून सातारा शहराचा आकडा वाढू न देण्यासाठी शहरवासीयांची साथ हवी आहे.
सातारा शहर हे कोणत्याही शासनाच्या योजना राबवण्यात अग्रेसर नेहमी राहिले आहे.मात्र, या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्नशील शहरवासीय असताना शहरात कोरोनाला शिरू द्यायचे नाही असा निर्धार सातारकर जनतेने केला होता.पोलीस, आरोग्य यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे.वाटेतच कोरोनाला अडवण्याला जोरदार प्रयत्न सुरू आहेत.असे असताना शहरात गेल्या पाच दिवसात आकडा चढू लागला.शहरात जिल्हा रुग्णालयात काम करणाया एका महिला कर्मचायास कोरोना झाल्याचे उघड होताच शहरात असलेली सुव्यवस्था आणखी कडक केली.ती महिला कर्मचारी जिल्हा रुग्णालयात सेवा देत होती.परंतु तिच्या व्यतिरिक्त राधिका रोडवरील गार्डन सिटी येथील संशयित महिला रुग्ण ही कराड सातारा असा प्रवास करते होती.कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ही कार्यरत आहे, असे समजते.तिने स्वतः हुन मी ठीक आहे असे ती रहात असलेल्या परिसरातील नागरिकांना सांगितले आहे.प्रतापगंज पेठेतल्या तो रुग्ण ही मुंबईतून आला असून तसेच जिल्हा कारागृहातले दोन कैदी ही पुण्यावरून आले आहेत.त्यामुळे शहरवासीय एवढे प्रयत्न करत होते परंतु बाहेरून आलेल्यानीच शहरात कोरोना आणल्याची भावना सातरकरं जनतेची बनू लागली आहे.या कोरोनाच्या मुसक्या आवळून गाठोडं बांधून परत पिटाळण्यासाठी सातारकर जनतेची अजून ही साथ हवी आहे.सातारा पोलीस दल आणि आरोग्य यंत्रणा, पालिका प्रशासन जीव तोड मेहनत घेत आहे.त्या मेहनतीला सातारकर जनतेची साथ हवी आहे.
अ़फवाचे पेव मोठे;ख्रया अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा
कोरोनामुळे अगोदरच पॅनिक वातावरण झाले आहे.हलक्या काळजाच्या नागरिकांना तर आता आपली सुटका नाही अशी अवस्था नवीन बातमी पाहून वाटत आहे.त्यातच सोशल मीडियावर ही काहीही व्हायरल होत असल्याने शहरात अनेक अफवांचे पेव फुटू लागले आहे.येथे एक आढळला तेथे दोन आढळले अशा.त्यामुळे आणखी भीतीचे वातावरण होत असून नागरीकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियात अफवा पसरवणायावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.