बिटकॉईनवरून सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आरोप लक्षात घेता या प्रकरणातला संभ्रम दूर झाला नाही तर जनमानसात सरकार आणि पर्यायाने पक्षाबद्दल चुकीची समजूत पसरू शकण्याची भीती व्यक्त होत आहे.
कर्नाटकाची राजधानी बेंगळूरसह राज्यातील अनेक जिल्हय़ात अवेळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक हातचे जाण्याची भीती आहे. बेळगाव परिसरात तर हा पाऊस भातपिकांना मारक ठरतो आहे. पावसामुळे कोणकोणत्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्याचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱयांना सरकारने भरपाई देण्याची गरज आहे. कारण शेतकरी नेहमी अडचणीत असतो. पीक उदंड येते, तेव्हा कृषीमालाचा दर घसरतो. दर मिळतो त्यावेळी अवेळी पाऊस किंवा इतर कारणांमुळे पीक हातचे गेलेले असते. त्यामुळे साहजिकच घातलेले भांडवलही निघत नाही. या संकटातून शेतकऱयांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले तर साहजिकच पीक कमी मिळते. दरावरही त्याचा परिणाम होतो. कोरोनाच्या संकटातून आता कुठे परिस्थिती सावरत असताना अवेळी पावसाने पुन्हा संकट उभे केले आहे.
विधानपरिषदेच्या 25 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबरोबरच निजद नेतेही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या केवळ कर्नाटकच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजत असलेले बिटकॉईन प्रकरण निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. केवळ कर्नाटकापुरतेच नव्हे तर देशभरात हा मुद्दा लावून धरण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्य अभियानाला बेंगळूर येथे प्रारंभ झाला. पक्षाचे कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी या उपक्रमाला चालना दिली आहे. 50 लाख नव्या सदस्यांची नोंदणी करण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. याचवेळी आपल्या पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन बिटकॉईन प्रकरणात जी काही कागदपत्रे मिळतील, ती जमवून ठेवा. कारण, संपूर्ण देशभरात हा मुद्दा निवडणूक प्रचाराचा ठरणार आहे, असे सूचित केले आहे. यावरून बिटकॉईनवरून कर्नाटकात सुरू झालेले वादंग देशभरात पसरणार, याची लक्षणे दिसू लागली आहेत.
या मुद्दय़ावरून भाजप व काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱया थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनाच या मुद्दय़ावर विरोधकांच्या आरोपांना उत्तरे द्यावी लागली. पक्षश्रे÷ाrंच्या भेटीवेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून ज्ये÷ मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असताना आपल्याच पक्षातील नेते आपल्या मदतीला धावले नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यानंतर आता या मुद्दय़ावर आपल्या पक्षाची व मुख्यमंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी भाजप नेत्यांनी मोहीम सुरू केली आहे. मंत्री आर. अशोक, व्ही. सोमण्णा आदी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसजन खोटारडे आहेत. बिटकॉईन प्रकरणात सहभागी असणारे कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. काँग्रेस नेत्यांनी केवळ राजकीय कारणासाठी सरकारवर आरोप करण्यापेक्षा त्यांच्याजवळ माहिती असेल तर ती तपास यंत्रणेकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तर या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार श्रीकृष्णा ऊर्फ श्रीकी याला संरक्षण पुरविण्याची मागणी केली आहे. कारण हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सरकारने त्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
दक्षिणेतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची रविवारी तिरुपती येथे बैठक झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणासह दक्षिणेतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला होता. यानिमित्ताने कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई तिरुपतीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआधी त्यांनी भेट घेतली आहे. बिटकॉईन प्रकरणावरून सुरू असलेल्या घडामोडींची त्यांनी माहिती दिली आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणात सहभागी असणाऱयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असला तरी त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे अद्याप समाधान झालेले नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही या प्रकरणी माहिती जमविण्याचे काम हाती घेतले आहे. पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहण्याचे ठरविले आहे. लवकरच केंद्रीय नेतेही या बिटकॉईनच्या आखाडय़ात उतरणार आहेत. कारण सध्या दोन्ही पक्षांनी घेतलेली ताठर भूमिका, एकमेकांवर सुरू असलेले गंभीर स्वरुपाचे आरोप लक्षात घेता या प्रकरणातला संभ्रम दूर झाला नाही तर जनमानसात सरकार आणि पर्यायाने पक्षाबद्दल चुकीची समजूत पसरू शकते, याची भीती असल्यामुळेच भाजपने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर लवकरच सरकारकडून या मुद्दय़ावर पडदा पडू शकतो. काँग्रेस मात्र स्वस्थ बसणार नाही, असे चित्र सध्या पाहायला मिळते.
या आठवडय़ात आणखी एक मुद्दा ठळक चर्चेत आला आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हंसलेखा यांनी पेजावर मठाधीशांच्या दलित वस्त्यांना भेटी देण्याच्या उपक्रमाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. ‘मठाधीश दलितांच्या वसाहतींना भेटी देऊ शकतात, मात्र त्यांनी दिलेली कोंबडी, काळीज खाऊ शकतात का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. खरेतर पेजावर मठाधीशांसारख्या राष्ट्रसंतांच्या उपक्रमावर हंसलेखा यांनी आता आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. मात्र, त्यांनी नसता वाद अंगावर ओढवून घेतला आहे. विरोध वाढताच माफीही मागितली आहे. उडुपी पेजावर मठाचे सध्याचे मठाधीश श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनीही हंसलेखा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. हंसलेखा यांच्या माफीनाम्यानंतरही निषेधाचा सूर काही कमी होताना दिसत नाही.