अकबराच्या राज्यात कोरोनाची साथ आली होती तेव्हाची गोष्ट. अकबराला आधी काहीच उपाय सुचला नाही तेव्हा त्याने लॉकडाऊन जाहीर केला. गर्दी आणि रुग्णांचा संपर्क, संसर्ग टाळा वगैरे लोकांना आवाहने केली. एका सरदाराने त्याला लोकजागृतीची आयडिया सुचवली. त्यानुसार अकबराने जाहीर केले,
‘जो कोणी खोकत-शिंकत असलेल्या कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये रात्रभर पीपीई किट न घालता राहून दाखवील त्याला एक लक्ष सुवर्ण मोहरा इनाम मिळतील.’
हे ऐकून त्यात भाग घेण्यासाठी एक गरीब इसम दरबारात आला. अकबराने त्याला रुग्णालयात पाठवले. रात्रभर त्याने रुग्णांचा सहवास सहन केला आणि सकाळी इनाम मागायला तो दरबारात आला. अकबर त्याला इनाम देणार, इतक्मयात एका दरबारी माणसाने चुगली केली, ‘हुजूर, रुग्णांच्या वॉर्डमध्ये असला तरी तिथे एका काचेच्या कपाटात आर्सेनिक आल्बम, कोरोनील, भाभी जी का पापड वगैरे इम्युनिटी औषधे ठेवली होती. हा इसम त्या औषधांकडे बघत राहिल्यामुळे त्याला इम्युनिटी प्राप्त झाली असणार.’
मग अकबराने त्या इसमाला इनाम न देता हाकलून दिले. तो बिरबलाकडे गेला. दुसऱया दिवशी बिरबल दरबारात आला नाही. अकबराने त्याला शोधायला माणसे पाठवली. ‘बिरबल कोणाची तरी वाट बघतोय,’ असे सांगत ती माणसे परत आली. मग खुद्द अकबर बिरबलाच्या घरी गेला. बिरबल घराच्या दारात बसून दुर्बिणीतून काहीतरी बघत होता.
‘बिरबल, तू कोणाची वाट बघतो आहेस?’
‘काल रात्री मला स्वप्न पडले की माझ्या वॉर्डच्या विकासासाठी तुम्ही एक कोटी सुवर्णमोहोरा देणार असल्याचे जाहीर केलेत. ती रक्कम घेऊन येणाऱया माणसाची मी वाट बघतोय.’ ‘तुझ्या स्वप्नात मी तुला आश्वासन दिले तरी प्रत्यक्ष ते खरे होणे कसे शक्मय आहे?’
‘काचेच्या कपाटातली औषधे बघून एखाद्याला इम्युनिटी प्राप्त होत असेल तर हे देखील खरे होणे का शक्मय नाही?’
बादशहा हे उत्तर ऐकून वरमला आणि खाली मान घालून परत गेला. दुसऱया दिवशी सकाळी बादशहाने एक फतवा काढून बिरबलाला दरबारातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. त्याने जमवलेल्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला. शिवाय विविध कलमांखाली त्याच्यावर असंख्य खटले भरले.