71 मतदारसंघांमध्ये निवडणूक, मुख्य लढत दोन आघाडय़ांमध्ये
पाटणा / वृत्तसंस्था
लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील तिसऱया कमांकाचे मोठे राज्य असणाऱया बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज बुधवारी होत आहे. कोरोना काळातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. या टप्प्यात 71 मतदारसंघांमध्ये लढत होत असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी आघाडी यांच्यात तीव्र चुरस असल्याचे चित्र आहे.
मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत होणार आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मतदारांना अनेक सुविधा देऊ करण्यात आल्या आहेत. या टप्प्यातील अनेक मतदारसंघ नक्षल प्रभावित क्षेत्रांमध्ये येत असल्याने सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
पहिल्या टप्प्यात 1 हजार 66 उमेदवार मैदानात आहेत. तसेच सहा मंत्र्यांचे भवितव्यही ठरणार आहे. मतदानाच्या शेवटच्या तासात कोरोनाबाधित मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 80 वर्षांवरील आणि अपंग अशा 52 हजारांहून अधिक मतदारांनी टपाल मते घालण्यासाठी अनुमती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात प्रमुख लढत संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात होत आहे. या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे 41 आणि 42 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे पेले आहेत. भाजप 29 जागांवर मैदानात आहे. तर लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवार 41 स्थानी आहेत.