ऑनलाईन टीम / पटना :
बिहारमध्ये विषारी दारूने मागील सहा दिवसात 40 जणांचा बळी घेतला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 16 नोव्हेंबरला दारुबंदीबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
बिहारमध्ये दारूविक्री आणि उत्पादनावर बंदी आहे. तरी देखील दारु माफियांनी बिहारमध्ये उच्छाद मांडला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून विषारी दारुमुळे काही लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर सिवान, गोपालगंज, बेटिया, मुझफ्फरपूर, भागलपूर सारख्या जिल्ह्यातून मृत्यूचे आकडे समोर येऊ लागले. मागील 6 दिवसात विषारी दारुमुळे बिहारमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून 280 लिटर देशी दारू जप्त केली आहे. तसेच तीन दारू विक्रेत्यांनाही अटक केली आहे.