ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये पहिल्याच पावसात वादळाने तांडव केेलेे. राज्यातील विविध भागात वीज कोसळल्याने जवळपास 83 लोकांचा जीव गेला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत.
राज्यातील 23 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोपळगंज जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 13 जणांचा मृत्यू झाला. मृत झालेले लोक हे पूर्व चंपारण्य, बांका, भागलपूर, मधुबनी, सिवान, दरभंगा आणि नाबदा या जिल्ह्यातील आहेत.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली असून या नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.