बेंगळूर/प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा दावा केला की १० नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी कर्नाटकात आपला मुख्यमंत्री बदलेल.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य नसून त्यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर येडियुरप्पा यांनी विधानसभेच्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्ष सिद्धरामय्या यांना विरोधी पक्षनेतेपदावरून काढून टाकणार असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
यापूर्वी सिद्धरामय्या यांनी १० नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले जाईल. राज्य भाजपाने ते नाकारले असले तरी, ७७ वर्षीय येडियुरप्पा यांचे वय झाल्याने त्यांना या पदावरून काढून टाकले जाऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
सिद्धरामय्या यांनी शिमोगा येथे पत्रकारांशी बोलताना, १० नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीच्या निकालानंतर बदल होईल अशी माहिती मला मिळाली आहे. बर्याच दिवसांपासून बदल होणार असल्याचे चर्चेत आहेत. भाजपमध्ये दोन ते तीन गट असून सहा महिन्यांहून अधिक काळापासून नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय नेतृत्वालाही बदल हवा आहे कारण या सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोचला असल्याचे ते म्हणाले.