लॉकडाऊन
ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5 मे पासून जारी करण्यात आलेले लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. मात्र, अजूनही नाईट कर्फ्यूचे निर्बंध जारी असणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
- लॉकडाऊन हटविले, नाईट कर्फ्यू जारी
मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, प्रदेशात लावण्यात आलेला लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. प्रदेशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट झालेली दिसून आले आहे. त्यामुळे प्रदेशातील लॉकडाऊन हटविण्यात आले आहे. मात्र, सायंकाळी 7 ते सकाळी 5 वाजल्यापासून जारी करण्यात आलेला नाईट कर्फ्यू अजूनही जारी असणार आहे. यासोबतच 50 % क्षमतेने प्रदेशातील सरकारी आणि खासगी कार्यालये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत. तर दुकाने देखील सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवली जाणार आहेत.
यासोबत नितीश कुमार यांनी आणखी एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले की, अजूनही ऑनलाईन शिक्षण सुरू असणार आहे. खासगी वाहने चालविण्यास परवानगी असेल. यासाठी सध्या तरी एक आठवड्यापर्यंतचा अवधी असेल. पुढे ते म्हणाले, अजूनही आपल्याला गर्दी न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, बिहारमध्ये सोमवारी कोरोनामुळे 43 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 5,424 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत राज्यात 8,230 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत राज्यात 7,13,879 जणांना कोरोनाचा बाधा झाली आहे.