ऑनलाईन टीम / पटना :
बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या चाचण्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार बिहारच्या जनतेने राजद-काँग्रेसला कौल दिल्याचे दिसून येते.
243 जागांसाठी बिहारमध्ये शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. 122 ही मॅजिक फिगर बहुमताचा आकडा गाठू शकते. एक्झिट पोलनुसार कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकत नाही. राजद हा सर्वाधिक मते मिळवणारा तर भाजप हा दुसरा सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊ-सी वोटरच्या सर्वेनुसार 116 एनडीएला तर 120 जागा महागठबंधनला मिळतील. तर लोजपाला 1 आणि अन्य पक्षांना 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी-सी वोटरच्या सर्वेनुसार 104 ते 128 जागा एनडीएला मिळतील. तर 108 ते 131 जागा महागठबंधनला मिळतील, असा अंदाज आहे.
रिपब्लिक भारत जन की बातच्या सर्वेनुसार भाजप-जदयूला 91-117 तर राजद-काँग्रेसला 118-138 जागा मिळतील. तसेच लोजपाला 5-8 आणि अन्य पक्षांना 3 ते 6 जागा मिळतील.