बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कठोर पावले उचकली आहेत. राज्यात शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. ४ मे पर्यंत नाईट कर्फ्यू आणि हा विकेंड लॉकडाऊन असणार आहे. बीएमटीसी शनिवार व रविवार कर्फ्यू दरम्यान आवश्यक कामगारांसाठी फक्त ४५० ते ५०० बस चालविणार आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाचा वेग वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यपालांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन कोरोनावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी आढावा घेतला. यांनतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन न करता विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यात रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास आणखी कठोर उपाययोजना राबविण्याची शक्यता आहे.