कंपनी 4-जी आराखडा आखण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात स्वदेशी 4-जी नेटवर्कचा रोल आउटकरण्यासाठी आगामी काळात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनी देशभरात जवळपास 1.12 लाख टॉवर उभारण्याची योजना आखली जात आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
सदरची योजना आखण्यासोबत देशातील रेल्वेच्या अंतर्गत इंटरनेट कनेक्शनसह अन्य सेवांसाठी उपलब्ध करुन देणार असून ज्यामध्ये 5 जी नेटवर्कही सुरु करणार असल्याचे म्हटले आहे, कारण 100 किमी प्रती तास वेगाने चालणाऱया रेल्वेंमध्ये 4जी तंत्रज्ञानावर आधारीत सेवा खंडीत होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
भारतीयांनी विकसीत केले 4 जी नेटवर्क
मला आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे, की आम्ही 4-जी दूरसंचार नेटवर्क लवकरच लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये भारतामध्ये भारतीय इंजिनिअरिंग आणि संशोधकांनी याला विकसीत केले आहे. 4 जी नेटवर्क विकसीत केल्यामुळे जगभरामध्ये आमचे अभिनंदन होत असल्याचेही यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. .
5-जी लवकरच
बीएसएनएल 4-जी नेटवर्कसह लवकरच 6000 व त्यानंतर काही कालावधीनंतर 6000 टॉवरच्या आणखीन ऑर्डर देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असून संपूर्ण देशांमध्ये एक लाख टॉवरसोबत 5 जी तंत्रज्ञानावर आधारीत प्रणाली लागू करण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले आहे.