आचरा/ प्रतिनिधी-
आचरा बीएसनल टॉवर लाईट गेल्यावर बंद होत असल्याने नेटवर्क गायब होत आहे. पंचक्रोशीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 8 दिवसात बीएसनल टॉवरला बॅकअप ब्याटरी बसवून नेटवर्कची सुविधा सुरळीत न केल्यास गावातील बीएसनल सिमकार्ड परत करत उपोषणाला बसण्याचा इशारा आचरा गावचे माजी सरपंच चंदन पांगे यांनी दिला आहे.
आचरा गावातील व पंचक्रोशीतील बरेचसे नागरिक वर्क फ्रॉम होम करत असून, विद्यार्थी वर्गाचेही ऑनलाइन शिक्षण चालू आहे. असे असताना आचरा बीएसनल टॉवरची सुविधा लाईट गेल्यानंतर कोलमडून पडत आहे. अशी परिस्थिती गेले कित्येक महिने आहे वारोवार लक्ष वेधुनही कोणतंही दुरुस्ती झालेली नाही म्हणूनच आतातरी याबाबत योग्य ती दखल घ्यावी अन्यथा BSNL ची सिमकार्ड परत करत उपोषणला बसण्याचा इशारा आचरा गावचे माजी सरपंच चंदन पांगे यांनी दिला आहे.