बेंगळूर/प्रतिनिधी
उच्च शिक्षण विभागाने विज्ञान पदवी (बीएससी) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) निकाल विचारात न घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उच्च शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले, “आम्ही हा प्रस्ताव दिला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात कसे सामावून घ्यायचे यावर कुलगुरूंसोबत आम्ही चर्चा करीत आहोत, तसेच, यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, ” असे ते म्हणाले.
यापूर्वी असा निर्णय घेण्यात आला होता की उच्च शिक्षण विभाग बीएससी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी गुणांचा विचार करेल कारण द्वितीय पीयूसी परीक्षा रद्द झाली आहे. अभियंता बनण्याची किंवा वैद्यकीय प्रवेश घेण्याची इच्छा नसलेल्या आणि सीईटी देणार नसलेल्या बर्याच विद्यार्थ्यांनी यावर टीका झाली होती. दरम्यान, आता बीएससी प्रवेशासाठी सीईटी गुणांचा विचार होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पदवी अभ्यासक्रम सुरू करा
एनईपीनुसार राज्यातील विद्यापीठांना चालू शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितले आहे. यावर्षी द्वितीय पीयूसी परीक्षा रद्द झाल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. विद्यापीठे चार वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू केल्यास अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात मदत होईल. विद्यापीठाने अशा विकासाची सुरूवात करण्याची संधी देखील असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सांगितले