बेळगाव /प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात देण्यात येणाऱया रेशनधान्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. बीपीएल रेशनकार्डधारकांना 5 किलो मोफत तांदुळ देण्यात येत होते. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून आता माणसी 10 किलो तांदुळ देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात अनेक गोर-गरीबांना दिलासा मिळाला आहे. नियमित धान्याबरोबर प्रत्येक कुटुंबातील लाभार्थ्यांस वाढीव दहा किलो धान्य वितरित केले जाणार आहे.
लॉकडाऊन काळात अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. अनेकांच्या नोकऱया व उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशा संकट काळात शासनाने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मे व जून महिन्यासाठी बीपीएल कार्डधारकांना प्रत्येक व्यक्तीमागे 10 किलो तांदुळ आणि कार्डमागे 2 किलो गहू आणि अंत्योदय कार्डधारकांना 40 किलो तांदुळ वितरित करण्यात येणार आहे. या अतिरिक्त धान्याचा लाभ अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे गोर-गरीब जनता अडचणीत आली आहे. अशा संकट काळात गोर-गरीबांच्या मदतीसाठी केंद्र सरकार धावून आले आहे. गतवषी देखील कोरोना काळात अतिरिक्त रेशनचा पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना याचा लाभ मिळाला होता. गोर-गरीबांसाठी प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना राबविण्याची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत एका व्यक्तीला 10 किलो अतिरिक्त धान्य वाटप केले जाणार आहे.