निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पक्षांमध्ये चिंतन बैठका सुरू होतात. त्यामधून पराभवाच्या कारणांची मीमांसा केली जाते. पराभवापासून धडा घेऊन चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू होते. भविष्यातील वाटचालीसाठी याचा उपयोग होतो. निवडणुकीच्या राजकारणात जय-पराजय होत असतात. मोदींच्या राष्ट्रव्यापी नेतृत्वासाठी सतत पराभवाला सामोरे जाणाऱया आणि पराभवानंतर भाजप घेत असलेल्या चिंतन बैठकांची हेटाळणी केली जात असे. पण त्यातूनच आजचा जगात सर्वाधिक सभासद असलेला शक्तिशाली भाजप उभा राहिला आहे. विजयाचीसुद्धा चिकित्सा भाजपा करताना दिसतो. याउलट पक्ष संपण्याच्या स्थितीला आला तरी पक्षावर एकाच कुटुंबाचे वर्चस्व कसे राहील याचीच काळजी काँग्रेसश्रे÷ाrंना व त्यांच्याच मेहेरबानीने सतत जवळ असणाऱया कंपुला असल्याचे दिसते. राहुल गांधींना तर अधिकार हवेत, पण जबाबदारी नको. गांधी कुटुंबीयांच्या बाहेरचा अध्यक्ष हवा म्हणायचे आणि सरचिटणीसपद प्रियांका गांधीना द्यायचे व तब्बेत साथ देत नसलेल्या सोनिया गांधींनाच अध्यक्ष करायचे अशा धोरणांनी आहे तीही काँग्रेस रसातलला गेल्याशिवाय राहणार नाही. खरेतर कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. त्यामुळे पराभव हीसुद्धा अनेकदा पक्ष संघटनेच्या पुनर्रचनेसाठीची संधी म्हणून पहायला हवे. बहुतेक पक्ष त्यादृष्टीने पावले टाकत असतात. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे श्रेय घेणाऱया व त्यामुळेच दीर्घकाळ देशाची सत्ता उपभोगायला मिललेल्या आणि गेली सहा वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला मात्र याचे वावडे असावे. कारण एकापेक्षा एक लाजिरवाणे पराभव पत्करायला लागूनही काँग्रेसवर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही. तेच दरबारी राजकारण, श्रे÷ाRपुढे लाचारी करीत कुठलेतरी पद मिळवायचे, अशा वागण्याने गौरवशाली परंपरा असलेल्या काँग्रेसची एखाद्या साचलेल्या डबक्मयासारखी अवस्था झाली आहे. त्यामुळेच प्रत्येक पराभवानंतर लाचार नेते पुढे सरसावतात आणि या पराभवाला केंद्रीय नेतृत्व जबाबदार नसल्याचे उच्चरवाने सांगू लागतात. नुकत्याच काँग्रेसचा दारुण पराभव झालेल्या बिहारमधील निवडणुकीनंतरही तेच दिसले. इथे तर नुसती काँग्रेस हरली नाही तर काँग्रेसच्या या निष्क्रियतेमुळे तेजस्वी यादवांनी जीवाचे रान करून महागठबंधनाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. लोकसभेच्या निवडणुका दणदणीतपणे जिंकूनही बहुतेक राज्यात मात्र हार स्वीकारावी लागणाऱया भाजपाला संजीवनी मिलली. हिंदी पट्टय़ातील एका महत्त्वाच्या राज्यात भाजपाला नामोहरम करण्याची संधी केवळ काँग्रेसमुळे हुकली.
गेल्या एप्रिलमध्ये मराठवाडय़ातील एका प्रचासभेत मोदींनी काँग्रेसवर हल्ला करताना म्हटले होते, 2014 ला काँग्रेस 44 वर आली. आता यावेल संकट आणखी वाढणार आहे. दुर्बीण घेऊन काँग्रेसच्या नामदाराने (राहुल गांधींनी) एक अशी जागा शोधून काढली आणि तिथून (वायानाड) ते निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या रॅलीत त्यांचा झेंडा शोधावा लागत होता. काँग्रेस म्हणजे टायटॅनिक जहाज आहे, जे हळूहळू डुबत आहे. या जहाजात बसणारे सर्व जण बुडणार आहेत. मोदी भाजपचे असल्याने काँग्रेसवर अशी टीका करणार यात काही विशेष नाही. पण बिहारमध्ये काँग्रेसच्या साथीत निवडणुका लढलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे ज्ये÷ नेते शिवानंद तिवारी यांनी तर बिहारमध्ये प्रचार सुरू असताना राहुल गांधी प्रियांकाच्या शिमल्यातील फार्म हाऊसवर आणि प्रियांका गांधी घरीच पिकनिक करीत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात राहुल गांधी हे अजूनही अपरिपक्व व विद्यार्थीच असल्याचे म्हटले आहे. निदान अशा पक्षातीलच लोकांच्या तरी टीकेचा विचार काँग्रेस श्रे÷ाr करणार की नाही? तीन महिन्यांपूर्वी पक्षातील 23 नेत्यांनी पक्षनेतृत्वाला विचारधारेत बदल करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यातीलच एक असलेल्या कपिल सिब्बल यांनी आता नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आत्मचिंतनाची वेळ टळून गेली असून आता संघटनात्मक पातलवरील अनुभवी, विद्वान आणि राजकीय परिस्थितीचे आकलन असलेल्या लोकांना पक्षात संधी द्या, असे मत सिब्बल यांनी मांडले आहे. बिहारबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेसचा दारूण पराभव झाला. याचाच अर्थ प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणाऱया किंवा राज्यात थेट विरोधी पक्ष असणाऱया, अशा दोन्ही ठिकाणी मतदारांनी काँग्रेसला नाकारले हे सत्य काँग्रेसने स्वीकारण्याचे धाडस आणि इच्छाशक्ती दाखवायला हवी असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. सिब्बल यांनी थेट नाव घेतले नसले तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच त्यांचा रोख आहे. पण यावर लगेच पक्षांतर्गत विषय जाहीर बोलणे योग्य नसल्याचा सल्ला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिला आहे. देशातील अत्यंत महत्त्वाच्या अशा बिहार निवडणुकीत पंतप्रधान बारा सभा घेतात आणि वेळच वेळ हाताशी असणारे राहुल केवळ आठ सभा घेतात, यावरून त्यांची निष्क्रियता ठळकपणे दिसते. त्यामुळेच काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरून अंतर्गह कलह होण्याची चिन्हे आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर पुन्हा एकदा गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर काँग्रेसमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली असून आता काँग्रेसमधील काही ज्ये÷ नेते पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत देत आहेत. एकूणच बंडखोरीचा राग आळवणारे काँग्रेस नेते पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांना बाजूला सारण्यासाठी पंचायत निवडणुकात त्यांच्या समर्थकांना नेतृत्वाच्या इशाऱयावरून तिकीट नाकारण्यात येत आहे. फारुख अब्दुल्ला-मेहबुबा यांच्या आघाडीसोबत निवडणूक समझोता करू नये. कारण यामुळे जम्मूत काँग्रेसचे नुकसान होईल, असे आझाद यांचे मत होते. परंतु काँग्रेस नेतृत्वाने समझोता करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या मताची पक्षाला गरज नसल्याचे संकेतच त्यांना दिले आहेत. याचा अर्थ बाहेरच्यांच्या टीकेचा परिणाम काँग्रेस श्रे÷ाrंवर होत नाहीच पण पक्षातील जुन्या, जाणत्या नेत्यांचेही ऐकायचे नाही असे ठरवले असेल तर पक्ष टिकणार कसा? एकेकाल देशावर सत्ता गाजवणारा, जनमानसात पाळेमुळे रुजलेला हा राजकीय पक्ष अवघ्या सहा वर्षांत आपली पुरती रया घालवून बसावा, अपयशाची मालिका थांबवण्याची ऊर्मीही त्याच्यात उरू नये, हे लोकशाही व्यवस्थेसाठी काही चांगले लक्षण नाही. यावर खरेतर उपाय आहे. अगदी नेहरू-गांधींपासून काँग्रेस नेतृत्वाकडून अनवधानाने काही चुका झाल्या त्या स्वीकाराव्यात, जनतेची मनापासून माफी मागावी, केवळ अल्पसंख्याकांची बाजू न घेता बहुसंख्याकांच्या बाजूनेही आपण आहोत हे कृतीने सिद्ध करावे, भाजपा प्रमाणेच अति वरि÷ मंडलंना मार्गदर्शक मंडलत पाठवावे व काही दिवस तरी गांधी कुटुंबीयांनी नेतृत्व न करता कुटुंबाबाहेरील मास बेस असलेल्या प्रादेशिक तरुण नेतृत्वाचे सामुदायिक नेतृत्व तयार करावे तरच मोदी शहांच्या भाजपशी काँग्रेसला निदान 2024 मधील सार्वजनिक निवडणुकीत समर्थपणे दोन हात करता येतील.
विलास पंढरी, 9860613872