शेतकऱयांनी दिले जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे हे भूमाफीयांना पाठिशी घालत आहेत. कणबर्गी येथील जमीन बेकायदशीररित्या भूमाफीयांना दिली आहे. न्यायालयातही खोटी माहिती दाखल करत आहेत. केवळ लोकप्रतिनिधींच्या आशिर्वादाने त्यांना गेल्या साडे चार वर्षांपासून बेळगावात ठेवण्यात आले आहे. मात्र हे अधिकारी शेतकऱयांची दिशाभूल करत आहेत. तेंव्हा त्यांची इतरत्र बदली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देवून ही मागणी शेतकऱयांनी केली आहे. एकाच ठिकाणी साडेचार वर्षे या अधिकाऱयाला ठेवण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींमुळे तो अधिकारी मनमानीपणे कारभार करत आहेत, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. बाहेरच्या शेतकऱयांना 80 एकर जमीन या अधिकाऱयानेच खरेदी करुन दिल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे. तेंव्हा तातडीने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी या निवेनात करण्यात आली.
कणबर्गी परिसरातील शेतकऱयांच्या जमिनी बुडाने घेतल्या आहेत. मात्र त्यामध्ये दुसऱयांनाच ही जागा दिली आहे. वास्तविक शेतकऱयांना बुडाने जागा देणे गरजेचे आहे. भूमाफीयांचे ते एजंट आहेत. याचबरोबर बिल्डर लॉबीशीही त्यांचा संबंध आहे. तेंव्हा त्यांची बदली करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, बबन मालाई, भवानी मालाई, गजानन बिर्जे, रामा दस्की यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.