शहरात 292 तर ग्रामीण भागात 115 : परिस्थिती गंभीर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. मंगळवारी तब्बल 1320 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजे बुधवारीही तब्बल 956 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे. कर्फ्यू असतानाही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोना रुग्णांमुळे सिव्हिल हॉस्पिटल, अनेक खासगी हॉस्पिटल्स रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. बेड नसल्यामुळे अनेकांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत. या परिस्थितीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असताना म्हणावे तसे गांभीर्य अजूनही जनतेमध्ये नसल्याचेच दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास रुग्ण वाढण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे अनेक जण दगावतही आहेत. तेंव्हा कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी आरोग्य विभाग वारंवार आवाहन करत आहे. मात्र कर्फ्यूकाळात सर्व नियमच धाब्यावर बसविण्यात येत आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास साऱयांनाच गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. बुधवारी जिल्हय़ामध्ये 956 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये तालुक्मयातील एकूण 407 जणांचा समावेश असून शहरी भागातील 292 आणि ग्रामीण भागातील 115 जण आहेत. बुधवारी भाग्यनगर, टिळकवाडी, रामतीर्थनगर, खडेबाजार, शहापूर, आनंदनगर, अनगोळ, अंजनेयनगर, अन्नपूर्णावाडी, आझमनगर, बसवणकुडची, भडकल गल्ली, भांदूर गल्ली, बसव कॉलनी, बॉक्साईट रोड, हिंदवाडी यासह ग्रामीण भागातील एटीएस सांबरा, अतिवाड, आंबेवाडी, मुतगा, हिरेबागेवाडी, सुळेभावी, बेळगुंदी, गणेशपूर, कंग्राळी के. एच. काकती, के. के. कोप्प, हुदली, कंग्राळी बी. के., बाळेकुंद्री के. एच., मण्णिकेरी, मच्छे, बडस, पिरनवाडी, राकसकोप, सरस्वतीनगर-गणेशपूर, शिंदोळी, पंतबाळेकुंद्री या गावांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. शहरासह ग्रामीण भागामध्येही आता रुग्णांची संख्या वाढत असून याबाबत गांभीर्य घेणे गरजेचे आहे. जनतेने कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
दोघांचा मृत्यू; 198 जणांना डिस्चार्ज
बुधवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे तर 198 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून दररोज एक-दोन मृत्यूही होताना दिसत आहेत. तसेच कोरोनातून बरे होणाऱयांची संख्याही अधिक आहे. बुधवारी 198 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या 4 हजार 753 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.