बेळगाव तालुक्यातील 359 जणांचा समावेश, सक्रिय रुग्ण संख्या अडीच हजारांच्या घरात
प्रतिनिधी/ बेळगाव
बुधवारी आजवरच्या उच्चांकी 757 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येने केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही धक्काच बसला असून सक्रिय रुग्ण संख्या अडीच हजारांच्या घरात पोहोचली आहे. एका बेळगाव तालुक्मयात 359 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 12 हजार 560 जणांचा अहवाल यायचा आहे. 2 हजार 433 हून अधिक सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत असून 58 हजार 122 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 6 लाख 82 हजार 72 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 6 लाख 34 हजार 439 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अलतगा, मच्छे, बाळेकुंद्री, बस्तवाड, देसूर, पिरनवाडी, गणेशपूर, शिंदोळी, सुळेभांवी, हलगीमर्डी, हिंडलगा, हिरेबागेवाडी, होनगा, हुदली, काकती, मुत्नाळ, धामणे, कलारकोप्प, कंग्राळी बी.के., कंग्राळी खुर्द, हलगा, मच्छे, सांबरा, मारिहाळ, सुळेभांवी, पंतबाळेकुंद्री, वंटमुरी, के. के. कोप्प, सरस्वतीनगर, मुतगा, येळ्ळूर, अळवाण गल्ली-शहापूर, अमाननगर, अनगोळ, अन्नपूर्णवाडी, अंजनेयनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
अशोकनगर, ऑटोनगर, अजमनगर, बसव कॉलनी, बसवाणकुडची, भाग्यनगर, बिम्स् क्वॉर्टर्स, कॅम्प, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शाहूनगर, सह्याद्रीनगर, संभाजीनगर-वडगाव, संगमेश्वरनगर, काकतीवेस रोड, सरस्वतीनगर, शहापूर, शास्त्राrनगर, शिंदोळी क्रॉस, शिवबसवनगर, शिवाजी कॉलनी, शिवाजीनगर, श्रीनगर, हिंदवाडी, तानाजी गल्ली, मंगाईनगर-वडगाव, मार्कंडेयनगर, नानावाडी, नेहरुनगर, ओमनगर, पांगुळ गल्ली, रामतीर्थनगर, टी. व्ही. सेंटर, विरभद्रनगर, विनायकनगर, भाग्यनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
हिंडाल्को कॉलनी, हालभांवी येथील आयटीबीपी, सांबरा येथील एटीएसमध्येही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुवेंपूनगर, लक्ष्मी टेकडी, अशोकनगर, महालक्ष्मीनगर, महांतेशनगर, माळी गल्ली, मजगाव, चव्हाट गल्ली, क्लब रोड, गोवावेस, गोंधळी गल्ली, गुडस्शेड रोड, हनुमाननगर, हिंदवाडी आदी शहरातील विविध भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. खास करुन टिळकवाडी, सदाशिवनगर, महांतेशनगर परिसरात रुग्ण संख्या वाढती आहे.
एकूण बाधितांची संख्या 32 हजार 273 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 360 जण दगावले आहेत. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 91 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. मंगळवारी 512 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. बुधवारी यावर्षातील उच्चांकी 757 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिस्थिती वेळीच आटोक्मयात आली नाही तर व्यवस्था कोलमडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.