प्रतिनिधी/ बेळगाव
बुधवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांना मोठा त्रास झाला. दिवसभर पाऊस आणि उन्हाचा लपंडाव सुरू होता. गणेशोत्सवाच्या तोंडावर खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली आहे. मात्र या पावसामुळे खरेदीदार तसेच विपेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. दिवसभर अचानकपणे पाऊस येत होता. तर काही वेळातच उन देखील पडत होते.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा सुरू होता. बुधवारी काहीसा सरींना वेग होता. मात्र अजूनही दमदार पावसाची पिकांना गरज असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. सध्या पडत असलेल्या रिपरिप पावसामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले असले तरी अजून मोठय़ा पावसाची गरज आहे, असे शेतकऱयांचे म्हणणे आहे. कोरोनानंतर आता बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. मात्र रिपरीप पावसामुळे खरेदीदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पावसाचा बाजारपेठेवरही काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.
पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. त्यामुळे रेनकोट घालायचा की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे अनेक जण भिजतच खरेदी करताना दिसत होते. यावषी झालेल्या दमदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱयांनी पुन्हा पेरणी केली. पेरणी केल्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मोठय़ाच पावसाची गरज निर्माण झाली आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा पिकांना मिळाला आहे. मात्र या कंटाळवाण्या पावसामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.