809 नवे रुग्ण, दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
बुधवारी जिल्हय़ातील 1056 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 809 नवे रुग्ण आढळून आले असून हुक्केरी तालुक्मयातील दोन महिन्यांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बेळगाव शहर व तालुक्मयात रुग्णसंख्या वाढत आहे.
शिक्षण संस्थांमध्ये कोरोनाची बाधा सुरूच आहे. बुधवारी बेळगाव तालुक्मयातील 275 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी शहर व उपनगरांतील 219 व ग्रामीण भागातील 56 जणांचा समावेश आहे. मृतांचा सरकारी आकडा 977 वर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून 6 हजार 753 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 93 हजार 858 वर पोहोचली आहे. त्यापैकी 86 हजार 128 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 3 हजार 227 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. केवळ दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
हुक्केरी तालुक्मयातील या बालकाला 17 जानेवारीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ताप व खोकल्याचा त्रास असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. उपचाराचा उपयोग न होता 30 जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी सांबरा एटीएसमधील आणखी दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अथणी तालुक्मयातील अडहळ्ळी येथे 12, नवलीहाळ येथे 5, करलट्टी येथे 11, ममदापूर येथे 8 शाळकरी मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घटप्रभा सेवादलातील 14 जणांना कोरोनाची लागण झाली असून संबरगी (ता. अथणी) येथील कॉलेजमधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अथणी येथील एका खासगी प्रशिक्षण संस्थेतील 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आरसीयूमध्ये कोरोनाचा शिरकाव : प्राध्यापकांसह विद्यार्थी बाधित
राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू)मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्राध्यापकांसह विद्यार्थीही कोरोनाबाधित झाले आहेत. 32 विद्यार्थी व 10 प्राध्यापकांना कोरोनाची लागण झाली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामचंद्र गौडा यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी व प्राध्यापकांना रजेवर पाठविण्यात आले आहे. विद्यापीठात कोरोनाबाधित सापडताच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.