ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत ‘सुवर्ण’पदकावर आपले नाव कोरले. या सामन्यात कृष्णाने चीनी प्रतिस्पर्ध्याचा 21-17, 16-21,21-17 असा पराभव केला. दरम्यान, याच स्पर्धेत आज भारताच्या सुहास यथिराजनेही रौप्यपदकाची कमाई केली आहे.
टोकियो पॅरालिम्पिकचा आज शेवटचा दिवस आहे. आज अखेरच्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरूच ठेवली. या स्पर्धेत भारताला 19 पदकं मिळाली आहेत. त्यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.