गैरसोयीचा कळस ठरलेले बॅरिकेड्स हटविण्याची मागणी : नागरिकांना सकाळी 7 वाजता वीरसौध येथे उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
देशमुख रोडहून जाणाऱया व काँग्रेस रोडहून येणाऱयांना शिस्त लागेल, मी पुढे का तू पुढे हे बंद होईल. हा उपाय प्रायोगिक तत्त्वावर करून पाहावा. तसेच गैरसोयींचे, धोकादायक, यमदूत ठरलेले बॅरिकेड्स काढावेत. संपूर्ण काँग्रेस रोडवर क्रॉस रोड, संपर्क रस्ते जेथे जेथे आहेत तेथे गतिरोधक घालावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
या मागणीसाठी रहिवासी, व्यापारी, वाहनधारक, विद्यार्थी, गवळी समाज, रिक्षाचालक यांच्यावतीने शनिवार दि. 2
ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सत्याग्रह करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी सकाळी 7 वाजता काँग्रेस विहिरीजवळ (वीरसौध) उपस्थित रहावे, असे सुभाष घोलप यांनी कळविले आहे.
टिळकवाडी पहिले रेल्वेगेटजवळ वाहतुकीच्या सोयीच्या नावाखाली दहा बॅरिकेड्स लावून संपूर्ण येण्या-जाण्याचा मुख्य संपर्क रस्ताच बंद करण्यात आला आहे. या घटनेला 7 वर्षे 3 महिने 13 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे पाळीव प्राणी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, भाजीविपेते, फळविपेते, इतर व्यापारी, रिक्षाचालक, दुचाकी-चारचाकी वाहनधारक व पादचारी या सर्वांना गैरसोयीच्या बॅरिकेड्सचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काँग्रेस रोडवर दोन ठिकाणी वळण घ्यावे लागते. बॅरिकेड्सच्या पलीकडे जाताना दोन रस्ते पार करून जावे लागत आहे. तसेच असे चार ठिकाणी रस्ते पार करून जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच संपूर्ण काँग्रेस रोडवर तिसऱया रेल्वेगेटपासून गोगटे सर्कलपर्यंत गतिरोधक नाहीत. सध्या गतिरोधक आहेत, ते कुचकामी ठरत आहेत. हे गतिरोधक उंच नाहीत. त्यामुळे वाहनांवर त्याचा किंचितही परिणाम होत नाही. वाहने सुसाट धावत आहेत. काँग्रेस रोडला जणू पुणे-बेंगळूर हायवेचे स्वरूप आले आहे.
आवश्यक ठिकाणी गतिरोधक घालण्याची मागणी
नानावाडी क्रॉस, मराठा कॉलनी क्रॉस, स्वामी विवेकानंदनगर, म. गांधी कॉलनी, शांतीनगर, शिवाजी कॉलनी, पापामळा या भागात जायचे असल्यास जीव मुठीत धरून जावे लागते. त्यामुळे जेथे जेथे क्रॉस आहेत, तेथे वाहतुकीची केंडी होत आहे. काँग्रेस रोडवर प्रत्येक क्रॉसवर गतिरोधकाची अत्यंत गरज आहे. तसेच धोकादायक व गैरसोयीचा कळस ठरलेले बॅरिकेड्स काढावेत. हे बॅरिकेड्स म्हणजे नागरिकांसाठी यमदूतच झालेले आहेत. तसेच बॅरिकेड्सच्या आसपास म्हणजे मंडोळी रोडहून येताना पहिल्या रेल्वेगेटजवळ युनियन बँकेच्या एटीएमजवळ, हेरवाडकर बिल्डिंगजवळ व नारायण पै यांच्या इमारतीसमोर म्हणजे कल्याणी स्वीटमार्टसमोर गतिरोधक पाहिजे. त्यामुळे मंडोळी रोडहून देशमुख रोड येथे येणे सोयीचे
होईल.
त्याचप्रमाणे रेल्वेगेटमधून वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून रेल्वेरुळाच्या बाजूने मधोमध 6 इंचांचा कट्टा बांधल्यास देशमुख रोडहून जाणाऱया व काँग्रेस रोडहून येणाऱयांना शिस्त लागेल. या सर्व मागण्यांसाठी सत्याग्रह करण्यात येणार आहे.