बेंगळूर : देशातील प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी विद्युतचलित बसेसचा वापर करण्यास केंद्र सरकार उत्तेजन देत आहे. त्यानुसार बेंगळूर शहरात 350 इलेक्ट्रिक बसेस कंत्राटी तत्वावर घेऊन फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. राज्य परिवहन मंडळाच्या मंगळूर विभाग, शहर परिवहन निर्देशनालयाच्या सहकार्याने उडुपी येथे 3.95 कोटी रुपये खर्चुन निर्माण करण्यात आलेल्या शहर परिवहन बसस्थानकाचे उद्घाटन करून ते बोलत होते. दिल्ली, कोलकाता, बेंगळूर, मुंबई, चेन्नईसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक बसेस वापरण्यास प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी प्रत्येकी केंद्र सरकार 55 लाख रुपये आणि राज्य सरकार 33 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे. एक इलेक्ट्रिक बससाठी 2 कोटी रुपये खर्च होणार असून सबसिडी देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
Previous Articleरायचूर कृषी विद्यापीठाकडून फळांवर प्रक्रियेसाठी योजना
Next Article प्राध्यापकांच्या बदल्यांची प्रतीक्षा संपली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.