बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोविड -१९ प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासन चिंतेत असताना बेंगळूरमध्ये सुमारे ३ हजार कोरोना संक्रमित लोक बेपत्ता झाले आहेत तर अनेकांनी आपला फोन बंद केला आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांना सुपूर्द केले आहे.
कर्नाटकचे महसूलमंत्री आर अशोक यांनी असा दावा केला आहे की बेपत्ता माणसे हा रोग पसरवत आहेत. दरम्यान पोलिसांना त्यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान सकारात्मक रूग्णांच्या या वृत्तीमुळे संसर्ग पसरेल. त्या संबंधित रूग्णांना परत येण्याचे आवाहन करतो, असे ते म्हणाले. तसेच आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून संक्रमित रुग्ण बेपत्ता होण्याची प्रकरणे नोंदविला जात आहेत.
“आम्ही लोकांना मोफत औषधे देत आहोत, ज्यामुळे ९० टक्के प्रकरणे नियंत्रित होऊ शकतात, परंतु त्यांनी बेपत्ता होऊन आपला मोबाईल बंद केला आहे. नंतर ते अत्यंत गंभीर अवस्थेत आयसीयू बेड शोधत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. हेच आता घडत आहे, असे अशोक यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
“मला असे वाटते की बेंगळूर मधील किमान २ ते ३ हजार लोकांनी आपला फोन बंद केला आहे आणि घरे सोडली आहेत. ते कुठे गेले हे आम्हाला ठाऊक नाही. ” असे ते म्हणाले.